आपल्याकडे हातांना मेंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेंदी काढणे हा तर एक सोहळाच असतो. केस रंगवण्यासाठीही मेंदी लावली जाते. पण या मेंदीचेही दुष्परिणाम होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
मेंदीने खरंच दुष्परिणाम होतात का ?
नवी दिल्ली येथील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, त्वचारोगतज्ज्ञ तसेच विभागप्रमुख डॉ. अनिल गंजू यांच्या मते, शुद्ध हिरव्या रंगाची मेंदी लावल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. संवेदनशील त्वचा असणाऱ्या काही लोकांचा याला अपवाद आहे. याउलट काळ्या किंवा तपकिरी रंगाची मेंदी लावणे हानीकारक आहे.
मेंदीचे दुष्परिणाम –
त्वचारोग –
मेंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, काहीवेळा कमी कालावधीमध्ये अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात PPD (पॅरा-फेनिलीनडायअमाइन)मिसळतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसते की, PPD त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. उदा.; खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे.
केसांना शुष्कता –
केसांना लावण्याची मेंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक मिसळल्यामुळे केस शुष्क होतात. तसेच डोक्याला खाज सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात. (घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय !)
डोळे लाल होतात –
मेंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अशा वेळी थंड पाण्याने डोळे धुवावेत व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लाल पेशी फुटणे –
ज्या मुलांना G6PD ची (6 ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची) कमतरता असेल त्यांच्या हातांना मेंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारिरीक समस्या निर्माण होतील. असे काही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पोट बिघडणे –
कोणत्याही स्वरुपातील मेंदी पोटात जाणे मानवी आरोग्यासाठी घातक असते. चुकूनही थोडीफार मेंदी पोटात गेली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मेंदीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले –
कधीही हातांना किंवा केसांना मेंदी लावण्याअगोदर पॅचटेस्ट करावी.
मेंदीमधील रासायनिक घटकांमुळे केस शुष्क न होण्यासाठी मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावावे.
मेंदी लावल्यानंतर शांपू व कंडिशनरचा (शक्यतो आयुर्वेदिक) वापर करून केस स्वच्छ धुवावेत.
मेंदी लावल्यानंतर खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास लगेचच हात किंवा केस धुवून त्यावर Allegra किंवाAvil यांसारखे अॅलर्जी कमी करणारे औषध लावावे.
यांसारखी लक्षणे आढळल्यास घरीच कोणतेही तेल किंवा क्रिम न लावता त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढच्या वेळी मेंदी लावताना या टिप्स लक्षात ठेवा आणि त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचा.
कैरी असे नुसते ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. मग शाळेच्या बाहेर तिखट मीठ लावून ठेवलेले कैरीचे काप असोत कींवा शेजारच्या काकूंच्या झाडावरची दगड मारुन पाडलेली कैरी असो. आंबट गोड चवीची ही कैरी खायला तर चविष्ट असतेच पण तितकीच ती आरोग्यासाठीही उपयुक्त असते. कैरीचे लोणचे, मुरांबा, मेथांबा, गुळांबा, साखरांबा असे अनेक प्रकार या सिझनमध्ये जेवणाचा स्वाद वाढवतात. याबरोबरच वर्षभरासाठी करुन ठेवले जाणारे हे पदार्थ आपल्या कधी कामी येतील सांगता येत नाही. याबरोबरच पन्हे, कैरीचा भात, कैरीची डाळ हे पदार्थही तितकेच चविष्ट असतात. आता काही दिवसांतच आंब्याचा सिझन कमी होईल आणि घरोघरी हे साठवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरु होईल. पाहूयात आहारात कैरीचा नेमका काय आणि कसा उपयोग होतो.
पोटाच्या तक्रारींसाठी उपयुक्त
या दिवसांत पोटाशी निगडित समस्या उद्भवतात. गॅसेस, अपचन यांसारख्या तक्रारी वाढतात आणि पचनशक्ती क्षीण होते. मात्र कैरीमुळे या तक्रारी दूर होण्यास निश्चितच मदत होते. कैरीचे पदार्थ खाल्ल्याने ही बिघडलेली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
हिरड्यांच्या मजबूतीसाठी फायदेशीर
कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. काहींना विविध कारणांनी हिरड्यांमधून रक्त येते. ते रोखण्यासाठी कैरी अतिशय उत्तम काम करते. कैरीमुळे दात मजबूत राहतात. तसेच तोंडाचा वास येण्याची समस्याही कमी होते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
आंबा खाल्ल्याने वजन वाढते असे आपण या काळात अनेकदा ऐकतो. पण आंब्यामुळे वजन वाढत नाही. तसेच कैरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीला कमी करण्यासाठी कैरीचे सेवन फायदेशीर ठरते.
त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय
उन्हामुळे त्वचेवर येणारे रॅशेस कमी करण्यासाठी कैरीचा उपयोग होतो. उन्हामुळे शरीरात वाढणारा थंडावा कमी करण्यासाठी कैरीचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात घाम येणे हे अतिशय सामान्य आहे. मात्र कैरीचा रस प्यायल्यास घाम येणे कमी होते. घामाद्वारे शरीरातील आयर्न आणि सोडियम क्लोराईडची पातळी कमी होते. मात्र कैरीचा आहारातील समावेश ही पातळी भरुन काढण्यास उपयुक्त ठरतो.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत
सध्या मधुमेह ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहणे आवश्यक असते. कैरीच्या सेवनाने हे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठीही कैरीची मदत होते.
पुर्वीपासून आपण आजीच्या बटव्यातल्या खास गोष्टींचा वापर करत आलेलो आहोत. अगदी लहान मुल असो किंवा वयस्क व्यक्ती, वेळ आल्यावर आजीचा बटवाच आपल्या कामी येतो. कालांतराने या बटव्यामध्ये नवनवीन गोष्टींची भर पडत गेली. केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थांपासून आपण आपल्या सौंदर्यांत भर पाडू शकतो. सध्या अनेक तरुणी सुंदर दिसण्याच्या नादात विचार न करता नवनवीन प्रसाधनांचा वापर करताना दिसतात. काही तरुणी तर यावर भाळून ही प्रसाधने विकत घेतात. मात्र या केमिकलयुक्त प्रसाधानांच्या वापरामुळे त्वचा काही काळ चांगली दिसत असली तरी सततच्या वापराने त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.
प्रवासादरम्यान अनेक वेळा धूळ,माती उडाल्यामुळे हे धुलीकण चेह-यावर जमा होतात. यामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होऊन त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे चेह-यावर डाग, पुटकुळ्या येतात. तसचे प्रखर उन्हाचा सतत भडीमार झाल्यामुळेही त्वचा टॅन होते. सूर्यामधून बाहेर पडणा-या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभाव सरळ आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे त्वचेच्या मूळ रंगात बदल होऊन त्वचा काळवंडते. ही काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ करण्यासाठी फळभाज्यांमधली काकडी उपयुक्त ठरु शकते.
१. काळवंडलेली त्वचा तसेच तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी अनेक वेळा टोनरचा वापर केला जातो. टोनिंग केल्याने चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहरा पुर्ववत होण्यास मदत होते.
२. टोनर हे एक प्रकारचे अॅस्ट्रिंजेट आहे. मात्र बाजारात मिळणारे टोनर केमिकलयुक्त असते. यामुळे चेह-याला त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त होता. या कारणामुळे बाजारात मिळणा-या टोनरपेक्षा जर घरी असलेल्या साधनांचा वापर करुन टोनिंग केले तर चेह-याची हानी होणारी नाही. टोनिंगसाठी काकडी हा सर्वात्तम पर्याय आहे. काकडीमध्ये अँटीऑक्सि़डंट, अँटी बॅक्टीरिअल, अँटी फंगल याव्यतिरिक्त अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो. ही पोषकतत्वे त्वचेची हानी होण्यापासून वाचवतात.
३. त्वचेला डायड्रेटेड ठेवण्याचे काम काकडी करत असून काकडीमुळे चेह-याचा रंग उजळतो. या काकडीचे टोनर करण्यासाठी प्रथम काकडीचे साल काढून काकडी मिक्सरच्या सहाय्याने बारीक करुन तिच्यातील पाणी गाळणीने वेगळे करावे. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन रोज दिवसातून दोन वेळा चेह-यावर शिंपडल्यास चेह-याचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.
४. दरम्यान, अवनीन वर्मा यांनी स्पष्ट केलेल्या काही मुद्द्यांनुसार, काकडी, लिंबू आणि मध यांच्या मिश्रणाचे टोनरही उपयुक्त असते. याच्या वापरामुळे चेह-यावरील डाग कमी होतात. तसेच मध नैसर्गिकरित्या ब्लिचचे कामही करते.
५. काकडीचा रस काढल्यानंतर राहिलेला चोथा फेकून न देता त्याचा उपयोग फेसपॅक तयार करण्यासाठीही होऊ शकतो. त्याप्रमाणेच डोळ्यांखालील वर्तुळे कमी करण्यासाठी आयमास्क म्हणूनही वापर करु शकतो. त्यामुळे काकडी केवळ जेवणाची चव वाढविण्यासाठी नसून शारीरिक सौंदर्यात भर घालण्याचेही काम करताना दिसून येते.
मुंबई : प्रत्येक मुलीला तिची त्वचा मुलायम आणि नितळ हवी असे वाटत असते. मात्र वयात येताना शरीरात होणारे हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवू शकतो. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निसतेज दिसायला लागते.
चेहर्यावरील खड्ड्यांची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्हांला काही घरगुती उपायांची मदत होऊ शकते. हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
चेहर्यावरील खड्डे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय
बेसनामध्ये दूध, लिंबू आणि दूध मिसळा. या मिश्रणाची पेस्ट त्वचेवर लावल्यास चेहर्यावरील खड्ड्यांचा आकार कमी होण्यास मदत होते.
तेलकट त्वचा असणार्यांसाठी लिंबूरस आणि मधाचं मिश्रण चेहर्यावर चोळल्यास फायदा होतो. दिवसातून 2-3 वेळेस हा उपाय नियमित केल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहर्यावरील डाग कमी करण्यास मदत होते.
चेहर्यावर नियमित कोरफडाचा गर आणि व्हिटॅमिन ईचं मिश्रण लावल्यास चेहर्यावर ग्लो येण्यास मदत होईल. रात्री हे मिश्रण चेहर्याला लावून झोपल्यास त्वचेवरील खड्ड्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. सोबतच कांजण्यांचे डाग दूर करण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरतो. नक्की वाचा : कांजण्यांंचे डाग हमखास दूर करतील हे घरगुती उपाय
मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाबपाणी हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहर्यावर खड्ड्यांचा त्रास असल्यास तो आटोक्यात राहतो.
मुंबई : कधी हार्मोन्सच्या असंतुलित प्रमाणामुळे तर कधी त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने चेहर्यावर पिंपल्स येतात. एखाद्या पार्टी किंवा सोहळ्याच्या दिवसात नेमका पिंपल आला तर चिडचिड होणं स्वाभाविक आहे. पण रातोरात असा एखादा पिंपल हटवण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातीलच काही पदार्थ मदत करू शकतात.
कसा दूर कराल पिंपल्सचा त्रास ?
रातोरात पिंपलचा त्रास टाळण्यासाठी तुम्हांला मेकअप करून लपवण्याची किंवा महागड्या क्रीम्सची मदत घेण्याची काही गरज नाही. त्याऐवजी तुमच्या घरातील हे काही पदार्थ ठरतील फायदेशीर
टुथपेस्ट -
पिंपल वाढू नये म्हणून त्यावर टूथपेस्ट लावण्याचा मार्ग अनेकजणी निवडतात. मात्र ज्या टुथपेस्टमध्ये triclosan हे अॅन्टी बॅक्टेरियल असतात. त्यामुळे अॅक्नेचा त्रास वाढवणार्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत होते. त्यामुळे हे तपासूनच टुथपेस्ट लावा.
कसा कराल उपाय
या उपायाकरिता पिंपलवर आधी बर्फाचा तुकडा दाबा. काही वेळाने चेहरा पुसून त्यावर टुथपेस्ट लावा. 15-20 मिनिटांनी टुथपेस्ट साध्या पाण्याने स्वच्छ करा.
मात्र तुमची त्वचा संवेदनशील असल्यास किंवा त्यामध्ये इतर काही त्रासदायक घटक असल्यास त्वचेवर खाज येऊ शकते. टुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?
मध आणि दालचिनी
मध आणि दालचिनी पावडर एकत्र करा. हे मिश्रण पिंपलवर दाबा. अर्धा तासात हे मिश्रण सुकेल. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. रात्री हा उपाय केल्यानंतर सकाळी पिंपलचा आकार कमी झालेला दिसेल.
लवंग आणि लसूण
तुम्हांला लसणाच्या वासचा त्रास नसेल तर तर लसूण आणि लवंग यांची एकत्र पेस्ट रात्री पिंपलवर लावा. सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
अॅपल सायडर व्हिनेगर
कापसाच्या बोळ्यावर अॅपल सायडर व्हिनेगर लावा. यामुळे रात्री पिंपल सुकायला मदत होते. सकाळी पिंपलचा आकार कमी होण्यास मदत होते. ५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब