Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

'डॉक्टर, मी वर्गात शिकताना चेहऱ्यावर कळ यायची. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागायचे आणि बोलणे बंद करून असह्य वेदनेने मी चेहरा धरून खुर्चीत बसायचो. हा 'ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया'चा अ‍ॅटॅक बघून वर्गातली मुलेदेखील रडायला लागायची,'... काटे हे माध्यमिक शाळेत शिकवणारे शिक्षक मला सांगत होते. 'ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया' (अर्थात टी. एन.) या आजारात चेहऱ्यावर येणारी कळ किती तीव्र असू शकते, याचे हे चालतेबोलते उदाहरण होते. काटे सरांना आठ वर्षांपासून टी. एन.चा त्रास होता. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया सेंटरमध्ये येणाऱ्या बहुसंख्य रुग्णांप्रमाणेच त्यांची कहाणी होती.

सुरुवातीला अन्न चावताना हिरडीला स्पर्श झाल्यावर 'करंट' बसल्यासारखी कळ येणे, त्यानंतर ओठाला, गालाला किंवा हनुवटीला स्पर्श झाल्यास जीवघेणी कळ येणे, हा त्रास सुरू झाला. दाताचे डॉक्टर व इतर काही प्रकारच्या डॉक्टरांना दाखवून झाले. निश्चित निदान न होता काही वर्षे गेली. त्यानंतर वेदना वाढली. न्यूरॅल्जियावरील औषधे सुरू झाली. वेदनेची तीव्रता व औषधांची मात्रा दिवसेंदिवस वाढत गेली. औषधांचे दुष्परिणाम एका बाजूला व वेदनेची टांगती तलवार दुसऱ्या बाजूला, या कात्रीत अडकून सरांचे जगणेच अवघड होऊन गेले.

रेडिओफ्रिक्वेन्सीसारखे छोटी सुई घालून करण्याचे काही उपाय करून बघितले; पण त्याचाही उपयोग तात्पुरताच झाला. या उपायानंतर पुन्हा वेदना सुरू झाली, तेव्हा तिची तीव्रता दुपटीने वाढली. वेदनेशी, औषधांच्या दुष्परिणामांशी व तात्पुरत्या उपायांच्या फोलपणाशी लढून जेव्हा मनुष्य थकतो तेव्हा, जीवन नकोसे वाटण्यापर्यंत त्याची मन:स्थिती पोहोचते. या सर्वाला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला.

आठ वर्षांनंतर आणि टी.एन.च्या वेदनेशी दिलेल्या जीवघेण्या लढाईनंतर एम.व्ही.डी. शस्त्रक्रियेबद्दल त्यांना माहिती मिळाली. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर औषधे व वेदना या दोन्ही शत्रूंपासून त्यांची सुटका झाली. एका वर्षाने ते परत दाखवायला आले. तेव्हा त्यांनी त्यांची खंत इतर असंख्य रुग्णांप्रमाणे माझ्याकडे व्यक्त केली, 'डॉक्टर, हा उपाय आठ वर्षांपूर्वीच करता आला नसता का?'

हा प्रश्न मला वारंवार सतावतो आणि गेली बारा वर्षे हा आजार व वेदना कायमचे बरे करण्याचा एक भाग म्हणून टी.एन.ची लक्षणे व एम.व्ही.डी. शस्त्रक्रियेमागचे शास्त्र लोकांसमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो.

खरबूज खाण्यात जितका लज्जतदार लागते तितकाच तो सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. खाण्यासोबतच तुम्ही खरबूज त्वचेवर लावल्यास तुम्हाला 'इस्टंट ग्लो' मिळेल. त्याचा फेसपॅक लावल्यानंतर तुम्ही काही मिनिटातच उजळल्याचा अनुभव घेऊ शकाल.


खरबूजाचा रस आणि दही

खरबुजात मोठ्या प्रमाणावर पाण्याची मात्रा असते. त्यामुळे त्याला कापल्यानंतर बऱ्यापैकी रस निघतो. त्यातून निघणारा रस एका वाटीत एकत्र करून घ्यावा. जितका रस निघेल तितक्याच मात्रेत त्यात दही मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणाचा लेप चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने लावावा. सुमारे १५ मिनिटांपर्यंत हा लेप तसाच राहू द्यावा. त्यानंतर चेहरा धुवावा. हा लेप लावल्यामुळे तुमचा चेहरा उजळल्यासारखा वाटू लागतो. उन्हामुळे आलेले काळे डाग काही प्रमाणात कमी होतात. तुम्ही सातत्याने जलतरण करीत असाल, तर हा फेसपॅक तुम्ही हमखास वापरलाच पाहिजे. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग, काळवटपणा कमी होईल. खरबुजाप्रमाणे त्याच्या बियादेखील उपयुक्त आहेत. बियांपासून तयार करण्यात आलेला फेसपॅक लावल्याने त्वचेची सखोल स्वच्छता होते. या मिश्रणात असलेल्या दह्यामुळे त्वचा मुलायम होते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावर त्यामुळे तजेलादेखील येतो. दह्यातील अनेक पदार्थ त्वचेसाठी मॉइश्चरायजरप्रमाणे काम करतात.


मधासह खरबूज

मध हे त्वचेसाठी अमृततूल्य आहे. त्याने फायदे अनेक आहेत. त्यामुळे त्याला बहुगुणी म्हणून ओळखले जाते. खरबुजाच्या रसात मध कालवावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. १५ ते २० मिनिटानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळल्यासारखे डाग पडले असतील, तर ते कालांतराने कमी होण्यासाठी हे फेसपॅक उपयुक्त आहे. घामामुळे येणारे मुरूम, पुटकुळ्या आणि तारूण्यपिटिकांवर हा फेसपॅक उत्तमप्रकारे काम करतो. धूळ-मातीमुळे अनेकदा चेहरा काळवंडतो. त्यामुळे त्वचेवरील सुक्ष्म छीद्र बंद होतात. ते उघडण्यासाठी या फेसपॅकमुळे मदत होते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली अस्वच्छता दूर होण्यास मदत होते.


असे होतील फायदे

- चेहरा थंड ठेवण्यास मदत होते.

- सनस्क्रीमसारखे काम करते.

- चेहऱ्यावरील काळे डाग दूर करते.

- त्वचेला आतपर्यंत स्वच्छ करते.

- त्वचा उजळण्यास मदत होते.


मधाचा उतारा

त्वचेवर मध वापरल्याने त्यावरील डाग दूर होतात. त्वचेतील मृतपेशीपासून मुक्तता मिळते. नव्या पेशी तयार होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'सनबर्न'मुळे जे डाग पडतात, ते कमी होण्यासाठी मध सहाय्यक ठरते. वातावरणात असलेल्या हानीकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदातरी चेहऱ्यावर मधाने मसाज करावा.


खरबूज अन् दूध

चेहऱ्यावरील काळसर डाग दूर करण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर ठरते. या मिश्रणातील दूध हे चेहऱ्यासाठी डाग दूर करण्याचे सर्वोत्तम साधन ठरते. त्यासाठी खरबुजाच्या रसात थोडे दूध मिसळावे. त्यानंतर कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. किंचित मसाज करावा. त्यानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हात फिरल्याने त्वचा लवकर काळी पडते. चेहऱ्यावर डाग पडतात. त्वचा भाजल्यासाखी होते. हे सर्व दूर करण्यासाठी खरबुजाचा रस आणि दुधाचे मिश्रण गुणकारी उपाय आहे.

--

खरबूज, काकडी

काकडीतील महत्त्वाचे घटक चेहरा थंड ठेवण्यासाठी मदत करतात. खरबूज आणि काकडीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील सर्व डाग नष्ट होतात. परंतु ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. हा पॅक वापरत राहिल्याने कालांतराने हे डाग नष्ट होतात. चेहऱ्याला नवीन तजेला देण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी हा पॅक लाभदायक आहे. उन्हातील तीव्र किरणांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही हा पॅक त्वचेला वाचवितो.

बदलत्या काळानुसार सौंदर्याची संकल्पना बदलत चालली आहे. प्रत्येक व्यक्ती प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.त्यातच मग अनेक तरुणी,महिला ओघाओघाने सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना दिसतात. मात्र या प्रसाधनांचा अतिवापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अनेक वेळा चेह-यावर पुटकुळ्या येणे, त्वचा काळवंडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर नैसर्गिक घटकांची मदत घेणे फायदेशीर ठरते.

आजीबाईच्या बटव्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या वापरामुळे शारीरिक समस्यांपासून सुटका मिळेल. त्यातलाच एक घटक म्हणजे कडूनिंबाचा पाला. कडूलिंबाच्या पाल्यामध्ये अनेक उपयुक्त घटक असून त्याच्या वापरामुळे त्वचेसंदर्भातील आजार, समस्या दूर होण्यास मदत होते. कडूनिंबापासून तेल, साबण,पेस्ट यासारख वस्तूंचे उत्पादन करता येते. कडूनिंबामध्ये अॅटी सेफ्टिक, अॅटी बॅक्टेरिअल हे गुणधर्म आहेत. कडूनिंबाचे हेच गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणतीही समस्या असल्यास कडूनिंबाच्या पानांचा किंवा पेस्टचा वापर करणे फायदेशीर ठरते. कडूनिंबाच्या पानांच्या पेस्टमुळे दूर होणारे असेच काही उपयोग दिक्षा झाब्रा यांनी सांगितले आहेत ते पुढील प्रमाणे –

१. चेह-यावरील डाग दूर होतात –
तरुण वयातील प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी तारुण्यपिटीकेचा सामना करावा लागतो. या तारुण्यपिटीकेमुळे चेह-यावर डाग किंवा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे चेह-यातील आकर्षकता कमी होते. चेह-यावरील हे डाग दूर करण्यासाठी कडूनिंबाची पाने आणि तुळशीची पाने एकत्र करु त्याचा लेप तयार करावा हा लेप गुलाब पाण्यात मिसळून चेह-यावर लावावा. लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते.

२. त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते –
सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे अनेकांचा चेह-या टॅन होतो.त्वचा काळवंडली जाते. अशावेळी प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा कडूनिंबाच्या पानांचा वापर कधीही योग्यच ठरेल. काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळविण्यासाठी कडूनिंबाची काही पाने, गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट गुलाबपाण्यात मिसळून हा लेप चेह-यावर लावा. लेप वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा.

३. त्वचेतील ओलावा टिकून राहतो –
काही व्यक्तींची त्वचा कोरडी असते. अशा व्यक्ती त्वचेतला ओलावा टिकून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नामध्ये मॉश्चरायझरचा वापर करण्यात येतो मात्र कालांतराने या प्रसाधनांचा साईड इफेक्ट जाणवू लागतो. हा साईड इफेक्ट टाळण्यासाठी प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरी तयार केलेल्या नैसर्गिक मॉश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकवण्याबरोबरच त्वचेसंदर्भातील अन्य समस्याही दूर होतात. यासाठी कडूनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडंस मध मिसळून हा लेप १५ मिनीटे चेह-यावर लावावा. त्यानंतर धूवुन चेहरा स्वच्छ करावा. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो.

४. चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होते –
अनेक वेळा चेह-यावर अतिरिक्त तेल जमा झाल्यामुळे चेह-यावर पुटकुळ्या येतात. यातूनच मग चेह-यावर डाग पडण्याची समस्या निर्माण होत असते. या समस्येपासून वाचण्यासाठी कडूनिंब गुणकारी ठरत असून कडूनिंबाच्या वापरामुळे चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. यासाठी कडूनिंबाची पेस्ट दही आणि लिंबाचा रस यांच्यासह एकत्रित करुन २० मिनीटे चेह-यावर लावा त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवा. हा लेप आठवड्यातून एकदा लावल्यामुळे चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.

५. चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात –
वय वाढत गेलं की त्याच्या खुणा चेह-यावर दिसू लागतात. यातूनच चेह-यावरील त्वचा सैल होऊन सुरकुत्या पडू लागतात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी कडूनिंबाचा वापर होऊ शकतो. यासाठी कडूनिंबाच्या पेस्टमध्ये चंदनाची पावडर एकत्र करुन हा लेप चेह-यावर लावावा. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

ऋतू बदलतोय. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेहमी असं भरून आल्यासारखं, रिझल्टची धाकधूक असल्यासारखं, टेन्शन आल्यासारखं वाटतं. उकाडाही असतो आणि मळभ दाटून येऊन पाऊस कधीही येईल याची एक आसवजा धास्तीही असते. म्हणून याकाळात मंद, उदास वातावरण असतं. मळभ येतं. एकदम उदास वाटतं. आळसही येतो. अनेकदा एकदम डिप्रेस वाटून रडू येऊ शकतं. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, अशी काही लक्षणं असतील तर किंवा दरवर्षी हवा बदलली की आपल्याला हमखास सर्दीखोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारात काही बदल करायला हवेत. पूर्वीच्या काळी रीतिभातीतून ऋतूप्रमाणे आहारबदल होत असे. आता आपण त्या साऱ्याकडे जुनाट म्हणून लक्ष देत नाही आणि आहारात योग्य बदल न केल्यानं ऋतूबदल त्रास देऊ शकतो.
त्यावर उपाय काय?
उपाय म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो.

१) व्हिटॅमिन डी
आपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्री-पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरं तर रोज सकाळी १० मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरून या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्त्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्त्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या.

२) प्रो बायोटिक
फार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणाºया हेल्दी बॅक्टेरियांची आतड्यांना मदत होणं. ते आतड्यात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्या-ताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नास्तयात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

३) झिंक
झिंक सप्लिमेण्ट प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनुका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानं झिंक सप्लिमेण्टची औषधं घेऊ शकतात.

४) आयर्न
लोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पीठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरं तर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

५) नास्ता
हा सगळ्यात सोपा उपाय. या काळात आणि पुढे पावसाळ्यातही भरपेट नास्ता चुकवायचा नाही. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. शक्यतो आंबवलेले पदार्थ टाळावेत. सकाळी पोटभर नास्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर. याकाळात अ‍ॅडमिशनची धावपळ असते तेव्हा घरातून निघतानाच भरपेट नास्ता आणि सोबत घरचा जेवणाचा डबा असणं उत्तम. एवढं केलं तरी आपण पावसाच्या स्वागताला सज्ज होतो.

वॉटरप्रूफ मेकअपला पर्याय आहे का? हे अवश्य वाचा.


स्विमींग पूल मध्ये डुंबताना अथवा पावसात भिजताना तुम्हाला तुमचा मेक-अप तसार रहावा असे वाटत असते.मग यासाठी तुम्ही अशा ठिकाणी जाताना वॉटरप्रूफ मेकअप करता.Cosmetologist डॉ.नंदीता दास यांच्याकडून जाणून घेऊयात वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का? तसेच वाचा मेकअप करताना कोणती काळजी घ्याल ?


वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का?

लक्षात ठेवा मेक-अप केल्यावर त्वचेतील घाम अथवा तेलामुळे तो खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मेक-अप मध्ये वापरण्यात येणारे घटक हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात.वॉटरप्रुफ मेक-अप मधील काही घटक जे तुमच्या त्वचेमधील पिगमेंटेशन झाकण्यासाठी वापरण्यात येतात ते घटक जर नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांप्रमाणे केमिकल-फ्री असतील तर ते वापरणे सुरक्षित असू शकते.पण काही वेळा अशा वॉटरप्रूफ मेक-अपची सौदर्यप्रसाधने वापरणे सुरक्षित असू शकत नाही.जाणून घ्या अ‍ॅक्नेचा त्रास असणार्‍यासाठी ‘4’ महत्त्वाच्या मेकअप टीप्स !


अॅनिमल व व्हेजीटेबल बेस वॅक्स,पॉलिमर व वॅक्स प्रमाणेच वॉटरप्रूफ मेक-अपच्या साहित्यामध्ये मध्ये देखील सिलिकॉन वापरण्यात येते ज्यामुळे तुमच्या त्वचेतील छिद्रे बंद होतात.ज्यामुळे तुम्हाला पिम्पल येऊ शकतात,त्वचेवर पुरळ व अॅलर्जी येऊ शकते.वॉटरप्रूफ फॉऊंडेशन मध्ये सामान्यपणे सिलिकॉन वापरण्यात येते.तसेच वॉटरप्रूफ मस्कारा मध्ये देखील कंडीशनिंग घटक असलेले तेल न वापरलेल्यामुळे या प्रसाधनाच्या वापरामुळे तुमच्या डोळ्याच्या पापण्या कोरड्या होण्याचा धोका असतो.वाचा फाऊंडेशनचा वापर करताना या ‘4’ चूका टाळा ‍!


वॉटरप्रूफ मेक-अप कसा काढावा?


चेह-यावरील जाड वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे महागडे क्लिनझर विकत घ्यावे लागते.वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरणे उत्तम ठरेल.यासाठी डोळे व डोळ्यांच्या पापण्यांवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावा.थोड्यावेळ ते तेल तसेच राहू द्या व काही मिनीटांनी तो भाग स्वच्छ धुवा.चेहरा व मानेवरचा वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे कोल्ड क्रीम वापरणे देखील फायद्याचे ठरते.वाचा खोबरेल तेल- त्वचा स्वच्छ करण्याचा आणि मेकअप काढण्याचा उत्तम उपाय !

टीप-जर तुम्हाला मेक-अप केल्यावर घाम येत असेल तर लगेच त्यासाठी वॉटरप्रूफ मेक-अप करण्याऐवजी Water Resistant चा मेकअपचा पर्याय निवडा.तसेच वाचा तेलकट त्वचेच्या समस्या दूर करतील ही ‘6’ तेलं.वॉटर रेसिस्टंट मेक-अप वॉटरप्रूफ मेकअप पेक्षा हलका असतो.त्याचा परिणाम अगदी वॉटरप्रूफ मेकअप सारखाच असतो मात्र त्याचे वजन हलके असते.तसेच या मान्सून मेकअप टीप्सनी रहा पावसाळ्यातही ‘ मोस्ट ब्युटीफुल’ !

Dr. Vrushali Sarode
Dr. Vrushali Sarode
BHMS, Homeopath Psychotherapist, 5 yrs, Pune
Dr. Rekha Y Sanap
Dr. Rekha Y Sanap
MD - Homeopathy, 13 yrs, Pune
Dr. Lalitkumar Thakare
Dr. Lalitkumar Thakare
BPTh, Homecare Physiotherapist Neuro Physiotherapist, 9 yrs, Pune
Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla
Dr. Maya Golikere
Dr. Maya Golikere
BAMS, Panchakarma General Physician, 2 yrs, Pune
Hellodox
x