Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात. या ऋतूत स्वत:ला ताजेतवाने आणि फिट ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस आणि थंड पेयांचे सेवन तुम्ही करत असाल मात्र यातच बेलाचा तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरु शकतो. बेलाच्या प्रयोगाने सौदर्य तर उजळतेच मात्र आरोग्यही चांगले राहते. बेलाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसाचा दररोज एक ग्लास बेलाचा रस प्यायल्यास त्याचा परिणाम काही दिवसांतच तुम्हाला शरीरावर दिसू लागेल.

उन्हाळ्यात लघवीचा त्रास होत असेल तर बेलाचा रस प्यावा.

बदलत्या जीवनशैली आणि ऑफिसमध्ये अनेक तास बसून राहिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. कमी वयात लोकांना ही समस्या सतावतेय. यावर जर दररोज बेलाचा रस प्यायल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो.

जर एखाद्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर बेलाच्या रसाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते.

ज्यांना हृदयासंबंधित रोगांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दररोज बेलाचा रस प्यावा. या रसात एक ते दोन थेंब तूप मिसळावे.

तोंड आल्यास बेलाचा रस प्यावा.

रक्त साफ नसल्यास अनेक समस्या निर्माण होतात. यावर बेलाचा रस प्यावा याने अनेक फायदे होतात.

उन्हाळा संपत आला असला तरीही त्याचा तडाखा अजिबात कमी झालेला नाही. उन्हाळ्यामुळे होणारी शरीराची लाहीलाही आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यां यांवर काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तात जास्त पाणी पिणे आवश्यक असते. मात्र याबरोबरच शहाळं पाणी, ताक, सरबते घेणेही आवश्यक असते. यात सर्वात उपयुक्त असे लिंबू सरबत उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकतो. उन्हामध्ये लिंबू सरबत घेतल्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ताकद भरुन येण्यास याची मदत होते. लिंबातल गुणधर्म आरोग्यासाठी उपयुक्त असतातच मात्र साखर आणि मीठाचाही थकवा कमी होण्यासाठी चांगला उपयोग होतो. पाहूयात लिंबू सरबताचे आरोग्याला होणारे फायदे…

१. दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास लिंबूपाण्यामुळे मदत होते.

२. सध्या लठ्ठपणा ही एक मोठी समस्या झाली आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही वजन कमी करायचे असल्यास लिंबूपाणी घेणे उपयुक्त ठरते. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

३. साखर न घालता घेतलेले पाणी मधुमेहींसाठीही उपयुक्त असते. तसेच यामध्ये कॅलरीज नसल्याने शरीरात साठणारे फॅटस साठत नाहीत.

४. लिंबात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

५. दुपारी जेवणानंतर लिंबूपाणी प्यायल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

६. उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.

Dr. Swapnil Mantri
Dr. Swapnil Mantri
MBBS, Pediatrician Physician, 7 yrs, Jalna
Dr. Chandrakant Raut
Dr. Chandrakant Raut
BAMS, Family Physician General Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Sonali wagh
Dr. Sonali wagh
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Rachana Parmar
Dr. Rachana Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 20 yrs, Pune
Dr. Manna  Varghese
Dr. Manna Varghese
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Hellodox
x