Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



 उन्हाळ्यातल्या आजारांवर उपाय काय?

उन्हाळा म्हणजे सुट्ट्या, प्रवास आणि मजामस्ती करण्याचा मौसम. मात्र, तापमानाचा पारा वाढतो, तसं उन्हाळी आजारांची बाधा होऊ नये म्हणून प्रत्येकानेच काळजी घेणं आवश्यक आहे. साधारणत: उन्हाळ्यात कोणते आजार होऊ शकतात आणि कशी काळजी घ्यावी याविषयी...

डासांमुळे होणारे संसर्ग

उन्हाळा संपत आल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळे भारतात दरवर्षी मलेरियानं आठ लाख व डेंग्युनं १.५ लाख मृत्यू होतात. त्वचेचा जास्तीत जास्त भाग झाकणारे कपडे घालणं आणि कीटकनाशकं फवारलेल्या जाळीच्या आत झोपणं हे प्रभावी उपाय आहेत. डीईईटीचा समावेश असलेल्या क्रीम्स योग्य प्रकारे त्वचेवर लावल्यास ते प्रभावी आणि सुरक्षित ठरतं. डास प्रतिबंधात्मक वेपरायजर्समधील रासायनिक कीटकनाशकांचं प्रमाण सौम्य असतं. 'नैसर्गिक' उत्पादनांमध्ये असलेले सिट्रोनेला आणि तेल डीईईटीपेक्षा कमी प्रभावी असतं आणि प्रभावी प्रतिबंधासाठी त्याचा वारंवार वापर करावा लागतो. पॅचेस आणि मनगटी पट्टे 'नैसर्गिक' असल्यामुळे लोकप्रिय असतात, पण ते कमी प्रभावी ठरतात. डासांना प्रतिबंध करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणंही कमी प्रभावी असतात.

उष्णतेशी निगडीत आजार

भारतातील तापमान अतिशय उच्च आणि धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतं. तापमानानं ४० अंशांची पातळी पार केल्यास काळजी घेणं जास्त गरजेचं बनतं, कारण त्याला उष्णतेची लाट म्हणतात. उष्णतेमुळे अंगावर पुरळ आणि चट्टे उठू शकतात. उष्णतेच्या काही तीव्र लाटांमुळे दरवर्षी भारतात किमान एक हजार मृत्यू होतात. प्राथमिक टप्प्यात शरीरातील पाणी कमी होणं, पायात गोळे येणं, उकाड्याने थकवा येणं असे प्रकार होतात. उष्माघाताच्या तीव्र उदाहरणांमध्ये उच्च पातळीचा ताप, श्वास घेण्यात अडचणी आणि बेशुद्ध पडणं असे प्रकार घडतात. या काळात चांगलं अन्न खाणं, भरपूर पाणी पिणं आणि शरीराला थंडावा देणं आवश्यक असतं. निरोगी राहाण्यासाठी काही सोपे प्रतिबंधात्मक उपाय करता येतील. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सुती कपडे घालणं, उन्हाच्या वेळेस घरात राहाणं आणि दिवसादरम्यान बाहेर जाण्याचं प्रमाण कमी करणं यांचा समावेश होतो. सन स्क्रीन्स आणि टोप्यांचा चांगला वापर होऊ शकतो. तहान लागली नसतानाही भरपूर पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. लघवी रंगहीन असल्यास त्याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये पुरेसं पाणी आहे.

त्वचेचे आजार

उष्णता आणि दमटपणा यामुळे खाज आणि पुरळ उठते. शरीराच्या झाकल्या जाणाऱ्या भागांवर साधारणपणे गुलाबी रंगाचे, दाणेदार पुरळ आणि लाल चट्टे दिसतात. काखांमध्ये तसंच मांडीच्या सांध्यामध्ये बुरशीजन्य संसर्ग, चट्टे आणि तीव्र खाज वारंवार दिसून येते. त्यास प्रतिबंध करण्यासाठी सैलसर कपडे घालणं आणि भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. उष्णतेच्या पुरळांवर कॅलामाइनचा समावेश असलेलं लोशन लावणं फायदेशीर ठरतं, ज्यामुळे खाज किंवा अस्वस्थता कमी होते.

पाण्याद्वारे होणारे संसर्ग

उन्हाळा आणि पावसाळ्यादरम्यान पाण्यातून होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण वाढतं. आतड्यांची आग होणं, आमांश आणि कॉलरामुळे जुलाब आणि उलट्या होतात. अतिसार झाल्यामुळे शरीरातील पाणी अतिशय कमी होऊन होणाऱ्या बालमृत्यूचं भारतातील प्रमाण दरवर्षी १.५ लाख इतकं आहे.

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये स्वच्छता, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि वैयक्तिक स्वच्छता यांचा समावेश आहे. शिजवलेले अन्न सुरक्षित असते. पाणी, कच्चे अन्न आणि न शिजवलेलं अन्न यांबाबतीत काळजी घेणं आवश्यक असतं. संसर्गजन्य मलाच्या एक ग्रॅममध्ये १० दशलक्ष विषाणू रोगाचं एक दशलक्ष सूक्ष्मजंतू असतात. हात धुणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि अभ्यास अहवाल असे दर्शवतात की केवळ हात स्वच्छ धुण्यामुळे अतिसारामुळे होणारे मृत्यू कमी होतात व दरवर्षी १.५ लाख जीव वाचू शकतात.

Dr. Zainab Shaikh
Dr. Zainab Shaikh
BAMS, Ayurveda, 2 yrs, Pune
Dr. Mahesh Mahjan
Dr. Mahesh Mahjan
BAMS, Ayurveda, 19 yrs, Pune
Dr.  Kishor Selukar
Dr. Kishor Selukar
BDS, Dentist, 9 yrs, Pune
Dr. Smita Darshankar
Dr. Smita Darshankar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Tushar Dorage
Dr. Tushar Dorage
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Hellodox
x