जगात वेळेपूर्वीच जन्माला येणाऱ्या बालकांचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. अशा बालकांच्या मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे अकाली बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ होत आहे.
मिरा रोडमध्ये राहणाऱ्या इशरत नवाज यांचं बाळ जन्माला आल्यापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून वाडिया रूग्णालयाच्या एन.आय.सी.यूमध्ये उपचार घेत आहे. २४ व्या आठवड्यातच म्हणजे अवघ्या साडे पाच महिन्यांतच इशरत यांच्या बाळानं जन्म घेतला. जन्मावेळी या बाळाचं वजन अवघं ७०० ग्रॅम इतकंच होतं. आता त्याचं वजन चौदाशे ग्रॅम झालं आहे. तरीही डॉक्टरांबरोबरच आईची त्याच्यावरची २४ तासांची देखरेख काही सुटलेली नाही.
२४ ते ३७ आठवडे म्हणजेच साडे पाच महिने ते साडे आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान जन्मलेलं बाळाला वेळेआधी जन्मलेलं बाळ किंवा 'प्री-मॅच्युअर बेबी' म्हटलं जातं. जगात दरवर्षी दीड कोटी बालकांचा जन्म वेळेआधी होतो. वर्षाला यातील २० लाख बालकांचा मृत्यू होतो. कारण ५ वर्षांपर्यंत त्यांच्या जीवाला धोका संभवत असतो.
जगात वेळेआधी जन्म घेतलेल्या बालकांची सर्वाधिक संख्या भारतात असून ती वर्षाला ३५ लाख इतकी आहे. लहान वयात लग्न होणं, खूप उशिरा मूल जन्माला घालण्याचं नियोजन करणं, बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, जंतुसंसर्ग, आयव्हीएफ तंत्रज्ञान, अशा विविध कारणांमुळे वेळेआधी मूल जन्माला येण्याचं प्रमाण वाढलंय.
अशी बालकं जगवण्यासाठी रुग्णालयांमधील एन.आय.सी.यूची गरज भासते. मात्र, तेवढ्या प्रमाणात खास करून ग्रामीण भागात एन.आय.सी.यू उपलब्ध नसल्यानं मूल दगावण्याचं प्रमाण अधिक आहे.
जगात वेळेपूर्वीच जन्माला येणाऱ्या बालकांचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. अशा बालकांच्या मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे अकाली बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. मिरा रोडमध्ये राहणाऱ्या इशरत नवाज यांचं बाळ जन्माला आल्यापासून म्हणजे गेल्या २ महिन्यांपासून वाडिया रूग्णालयाच्या एन आय सी यू मध्ये उपचार घेत आहे.
वजन अवघं ७०० ग्रॅम
२४ व्या आठवड्यातच म्हणजे अवघ्या साडे पाच महिन्यांतच इशरत यांच्या बाळानं जन्म घेतला. जन्मावेळी या बाळाचं वजन अवघं ७०० ग्रॅम इतकंच होतं. आता त्याचं वजन चौदाशे ग्रॅम झालं आहे. तरीही डॉक्टरांबरोबरच आईची त्याच्यावरची २४ तासांची देखरेख काही सुटलेली नाही.
जीवाला धोका
२४ ते ३७ आठवडे म्हणजेच साडे पाच महिने ते साडे आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान जन्मलेलं बाळ वेळेआधी जन्मलेलं बाळ म्हंटलं जातं.
जगात दरवर्षी दीड कोटी बालकांचा जन्म वेळेआधी होतो. वर्षाला यातील २० लाख बालकांचा मृत्यू होतो.
कारण ५ वर्षांपर्यंत त्यांच्या जीवाला धोका संभवत असतो. जगात वेळेआधी जन्म घेतलेल्या बालकांची सर्वाधिक संख्या भारतात असून ती वर्षाला ३५ लाख इतकी आहे.
लहान वयात लग्न होणं, खूप उशिरा मूल जन्माला घालण्याचं नियोजन करणं, बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, जंतुसंसर्ग, आयव्हीएफ तंत्रज्ञान, अशा विविध कारणांमुळे वेळेआधी मूल जन्माला येण्याचं प्रमाण वाढलंय.
अशी बालकं जगवण्यासाठी रुग्णालयांमधील एन आय.सी.यू ची गरज भासते. मात्र तेवढ्या प्रमाणात खास करून ग्रामीण भागात एन आय.सी.यू उपलब्ध नसल्यानं मूल दगावण्याचं प्रमाण अधिक आहे.
गर्भाच्या योग्य विकास व्हावा याकरिता त्याला 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहणं सुरक्षित आणि फायद्याचे असते. मात्र काही कारणांमुळे, चूकीच्या लाईफस्टाईलमुळे महिलांमध्ये प्रिमॅच्युअर डिलेव्हरी होण्याचा धोका असतो. मग 37 आठवड्यापूर्वीच लेबर पेन सुरू झाल्याचा धोका ओळखण्यासाठी काही लक्षणांबाबत पुरेशी जागृकता आवश्यक आहे.
वेळेपूर्वी प्रसुती होणार असल्याचा धोका कसा ओळखाल ?
कंबरदुखी -
गरोपणाच्या काळामध्ये कंबरदुखीचा त्रास होणं स्वाभाविक आहे. मात्र वेळेपूर्वीच लेबर पेन सुरू झाल्यास कंबरेमध्ये वेदना जाणवणं अधिक तीव्र होते. कंबरेच्या खालच्या बाजूला वेदना अतिप्रमाणात जाणवायला सुरूवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
रक्तस्त्राव -
वेळेपूर्वी लेबर पेन सुरू झाल्यास योनीमार्गामध्ये रक्तस्त्राव सुरू होतो. हे प्रिमॅच्युअर डिलेव्हरी होण्याचा मोठा संकेत आहे. याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.
दबाव वाढतो -
पेल्व्हिक भागात दबाव जाणवण्यासोबतच, योनिमार्गात वेदना जाणवत असल्यास हे प्रिमॅच्युअर डिलेव्हरीचे लक्षण आहे.
मन घाबरते -
गरोदरपणाच्या काळात उलटीचा त्रास, मन अस्वस्थ होणं हा त्रास जाणवतो. मात्र लेबर पेन सुरू झाल्यानंतर मनाची अस्वस्थताही वाढते.
आकुंचन -
वेळेच्यापूर्वी डिलेव्हरी होण्याचं एक लक्षण आकुंचन जाणवणं. दर दहा मिनिटांनी तुम्हांला हे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्त्रियांना या गोष्टीची जाणीव होत असल्यास दुर्लक्ष करू नका.