Infertility is on the rise in modern India. In men, the quality of semen is the main reason of failing to impregnate the partner. Healthy life style is effective in improving the chances for conception and can also help in increasing the sperm count.
- Control the cholesterol: Couples with high cholesterol levels take longer to conceive. Couples or either of the partner with high cholesterol find it difficult to conceive as compared to other couples. Maybe high levels of total cholesterol and free cholesterol are associated with a significantly lower percentage of spermatozoa. So, get in those whole grain fibres, whole fruits and lean plant proteins into your daily diet and keep a check on your lipid profile.
- Opt for fruits and vegetables: Eating yellow and orange coloured fruits and vegetables had a profound effect on the health of the sperm. Yellow and orange colour in fruits and vegetables is because of “carotenoids” including beta carotene which is converted to Vitamin A in the body. It is one of the most potent antioxidants. Sweet potato and melon were found to improve both the quantity and quality of sperms while red vegetables particularly tomatoes, which contains lycopene, improved the quantity of abnormally shaped sperms by 8-10%. The hero here was the carrot which increased the motility of the sperm, improving its chance to reach the egg.
- Go easy on processed food: Processed and fast foods are both known to be detrimental to health. Men who consume healthy & natural diet which includes whole grains, legumes, fruits vegetables and healthy fats, have better sperm motility.
- Keep the weight in check: The fact has been proved that an obese male partner may mean a delayed conception. Obesity is also known to reduce the sperm concentration. Increased BMI is also associated with decreased levels of testosterone and an increase in oestrogens – causing low sperm counts and infertility. Eat healthy and exercise regularly to improve sperm quality.
स्थूलपणा
पौगंडावस्थेतल्या स्थूलपणाचं वर्गीकरण करण्यासाठी बीएमआय अर्थातच बॉडी मास इंडेक्सचा वापर केला जातो. जे वजन (किलो) आणि उंचीचे (मीटर) गुणोत्तर असते. पौगंडावस्थेतला स्थूलपणा हा एखाद्या प्रौढ माणसाच्या स्थूलपणासारखाच असतो. या गुणोत्तरानुसार लठ्ठपणा कोणत्या स्टेजला आहे, हे समजून घ्यावं.
स्थूलपणाच्या स्टेज ओळखण्यासाठी हे गुणोत्तर समजून घ्यावं. बीएमआयचं गुणोत्तर १८:२५ असेल तर हे प्रकरण नॉर्मल आहे. बीएमआय गुणोत्तर २५:३० असेल तर ओव्हरवेट, ३०:३५ असेल तर स्थूलपणाच्या पहिल्या पायरीवर आहात आणि ३५:४०च्या पुढे असेल तर स्थूलपणाच्या दुसऱ्या पायरीवर आहात आणि ४० आणि त्यापुढे असेल तर गंभीर स्वरूपाचा स्थूलपणा आहे, हे समजून घ्यावं. कमरेचा घेर स्त्रियांमध्ये ८० सेंटीमीटरपेक्षा आणि पुरुषांमध्ये ९० सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणा आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांना निमंत्रण असतं. जस-जसा बीएमआय किंवा कमरेचा घेर वाढत जातो तशा शरीरात अनेक व्याधी निर्माण होतात. सर्वसाधारणपणे स्थूलपणाचा आजार हा अनुवांशिक स्वरूपातही दिसून येतो.
अनुवांशिकतेत आढळणारा स्थूलपणा हा फक्त तीस टक्के असतो. परंतु हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, अनेक घरात मधुमेह असतो आणि या घरांमध्ये स्थूलपणामुळे लहान वयातच मुलांना मधुमेह होण्याची शक्यता सर्वाधिक असते. पालकांपैकी एकजण लठ्ठ असेल तर मुलांमध्ये स्थूलपणाची शक्यता तीस टक्के असते. आई-वडिलांना दोघांनाही स्थूलपणा असेल तर ही शक्यता चाळीस टक्के होते. त्यासोबत मधुमेह असेल तर हे प्रमाण दुप्पट होतं. त्याबरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे की दर पुढच्या पिढीमध्ये हे आजार लहान वयात अधिक येतात. कुटुंबातल्या खाण्यापिण्याच्या सवयींचं स्थूलपणातलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःची चयपचयाची क्रिया जितकी कमकुवत असेल तितकी ती व्यक्ती या आजारांना बळी पडते.
या सगळ्याचा अर्थ असा आहे की, केवळ आमच्या कुटुंबात सगळे असेच आहेत म्हणून या आजाराकडे दुर्लक्ष करणं अक्षम्य आहे. उलट कुटुंबात आजार असेल (स्थूलपणा किंवा मधुमेह) तर जास्त विचारपूर्वक काळजी घेणं आवश्यक आहे. गेल्या वीस वर्षांच्या अनुभवावरून आम्ही हे सांगू शकतो की, व्यायाम आणि आहार यामुळे किंवा याद्वारे आपण पहिल्या पायरीवर असणारा स्थूलपणा (या वयातला) व्यवस्थित बरा करू शकतो. मात्र जर स्थूलपणाची दुसरी पायरी गाठली असेल तर काही विशिष्ट चाचण्या करून आणखी आजारांची सुरुवात झाली नाही ना हे तपासणं अत्यंत गरजेचं असतं. उदा. थायरॉईड, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयावर दाब, हाडांची ठिसूळता, लैगिंक समस्या. दुर्दैवानं या कुठल्याच आजारांची लक्षणं दिसून येत नसल्यामुळे आम्ही फक्त लठ्ठ आहोत, आम्हाला आजार नाही, असं म्हणणं म्हणजे अज्ञान आहे.
वरीलपैकी कुठलाही आजार तपासणीअंती आढळून आल्यास ही ओबेसिटी गुंतागुंतीची म्हणून ओळखली जाते. अशावेळी फक्त आहार आणि व्यायाम याद्वारे केलेल्या उपचारांचा उपयोग होत नाही किंवा उपयोग झाला तरी त्या दीर्घकाळ परिणाम दिसत नाही. अशावेळी काही औषधं, उपचार आणि काही शस्त्रक्रिया करून आपण रुग्णाला अनेक आजारांतून बाहेर काढू शकतो किंवा आजार संपूर्ण टाळू शकतो. योग्य वेळी योग्य उपचार घेणं या गोष्टाला असाधारण महत्त्व आहे. स्वादुपिंडावरील इन्सुलिन तयार करण्याच्या क्षमतेवर अतिरिक्त ताण आणि सेक्स ऑर्गन्सवर बऱ्यापैकी पडणारा ताण हे जर दूर केले नाहीत तर तरुणपणीच अशा मुलांना आरोग्याच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची भीती असते. त्यामुळेच योग्य वेळेत तज्ज्ञांकडून उपचार करून घेणं महत्त्वाचं आहे.
स्थूलपणावर करा 'हे' आयुर्वेदिक उपचार
बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे तारुण्यातच लठ्ठ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शरीरातील प्रत्येक अवयव ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. अन्यथा वेगवेगळे विकार आपली सोबत करू शकतात. स्थूलपणावर आयुर्वेदात उपाय आहेत. त्याचा वापर केल्यास आपलं शरीर बेढब होणार नाही.
सडपातळ, लवचिक शरीर हे तारुण्याचं एक लक्षण असतं. ही देणगी नसणारी व्यक्ती तरुण असली तरीही तरुण वाटत नाही. आजकाल तर फिजिकल फिटनेसचा जमाना आहे. त्यामुळे शरीर सडपातळ ठेवण्याकडे, त्यासाठी व्यायाम, डाएटिंग वगरे करण्याकडे अनेकांचा कल असतो. आयुर्वेदही या दृष्टीने व्यक्तीला अत्यंत उपयुक्त मदत करू शकतो.
वेळीच काळजी घेतल्यास लठ्ठपणा आटोक्यात आणता येतो. मात्र त्यासाठी आहार, विहार आणि उपचार यांची योग्य दिशा ठरवायला हवी. काही नियमांचं काटेकोर पालन करायला हवं.
पथ्यपाणी, व्यायाम, औषधी उपाययोजना यांचा विचार रुग्ण अगोदर का करीत नाहीत? स्थूलपणाचं मूळ कारण कफ या दोषाच्या प्रवत्तीत आहे. कफ म्हणजे मंद, सावकाश, मुंगीच्या गतीने हालचाल. त्यामुळे मेद, चरबी वाढतेय हे लक्षात येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो.
त्यानंतर मनुष्य थोडा आळस आणि चुकीचे उपचार करतो. मग मात्र रोग पक्कं घर करून बसतो. काही पालकांना त्यांची मुलं लठ्ठ होत आहेत हेच पटत नाही. आपली मुलं सुदृढ आहेत असंच त्यांना वाटतं.
सुदृढ आणि सुजलेलं शरीर यातील फरक त्यांच्या लक्षात येत नाही.
स्थूलपणा कमी करताना कटाक्षाने 'या' गोष्टी पाळा
- आनुवंशिकता आणि बीजदोष ही लठ्ठपणाच्या दृष्टीने गुंतागुंतीची कारणं असतात. मुलांकडे नीट लक्ष देणं, त्यांच्यावर अवाजवी बंधनं घालणं यामुळेही त्यांच्या शरीरात चरबी साठू लागते. आजचं जीवन यांत्रिक बनलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी विनाश्रम मिळण्याची व्यवस्था झाली आहे.
- व्यायामाचा, हालचालीचा अभाव, बैठं काम आणि सुखासीन जीवन हा अनेकांचा जीवनक्रम बनला आहे. मेद वाढवणारी दुपारची झोपही त्यात येतेच. थंड, जड, गोड, आंबट खारट पदार्थाचा अतिरेकी वापरही लठ्ठपणा वाढवायला कारण ठरतो. मेदवर्धक आणि मांसवर्धक पदार्थाचा अतिरेकी आहारही त्यात भर घालतो.
कारण त्यामुळे फक्त मेद, मांसधातूचं पोषण अधिक होतं.
- फास्ट फूडच्या नावाखाली अलीकडे अनेक जण पोटात वाट्टेल ते ढकलत असतात. त्यात मांसाहार, मद्यपान, आइस्क्रीम, मेवामिठाईचा आस्वाद यांची भर पडते. तेलकट, तूपकट आहारही लठ्ठपणाच्या दृष्टीने हानिकारक असतो. खाण्यात गहू, हरभरा, कडधान्य, कांदा, बटाटा, साखर यांचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असणं हेही मेदवाढीचं एक महत्त्वाचं कारण ठरतं.
- अनेक स्त्रियांना विटाळ कमी जातो, पाळी अनियमित असते. त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. पाळी चुकवण्यासाठी गोळ्या, औषधं घेणं किती हानिकारक ठरत असेल याची कल्पना केलेली बरी. उपाययोजना करण्यासाठी या कारणांचा शोध घेणं आणि लक्षणं समजावून घेणं अर्थातच आवश्यक आहे.
- लठ्ठपणाच्या विकाराची काही प्रमुख लक्षणं उंचीच्या मानाने वजन जास्त असणं, पोट, छाती, कुल्ले, मांडया मान या ठिकाणी बेढबपणा येणं, थोडयाशा श्रमाने धाप लागणं, पायावर, चेह-यावर सूज येणं, लघवी कमी होणं, लघवीला पुन्हा पुन्हा जावं लागणं, स्त्रियांना विटाळ कमी जाणं, अंगाला खाज सुटणं, त्वचा फाजील स्निग्ध दिसणं, कार्यशक्ती कमी होणं, विश्रांती घ्यावीशी वाटणं, जास्त झोप येणं, अंगाला घाण वास मारणं अशी लठ्ठपणा येण्याची लक्षणं असू शकतात.
- लठ्ठपणावर उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम वजन पाहणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर कोणते स्नायू शिथिल आहेत, कुठे चरबी वाढली आहे हेही पाहायला हवं, त्यामुळे नेमका व्यायाम सुचवणं सोपं जातं.
- मलमूत्र, घाम यांचा वेग आणि परिणाम पाहणंही आवश्यक आहे. लागलेली भूक, घेतलेला आहार आणि प्यायलेलं पाणी यामानाने मल, मूत्र आणि घाम यांचा निचरा होत नसेल तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात होणारच. स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या अनियमितपणाचा हाच परिणाम संभवतो. लठ्ठपणा, स्थूलता किती जास्त आहे हे ठरवण्यासाठी आनुवंशिकतेचा विचार उपयोगी पडतो.
- मलमूत्र साफ होण्यासाठी शोधनाचे उपचार उपयोगी पडतात. स्त्रियांची पाळी नियमित होण्यासाठी उपचार करावे लागतात. शरीरातून पुरेसा घाम निघत नसेल तर त्यासाठीही उपाय योजता येतात. रुक्ष अभ्यंग, व्यायाम यांचे नाना प्रकार उपयोगात आणता येतात.
- मात्र उपवास, लंघन, अशा उपायांनी थकवा, रसक्षय आणि पंडुता येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
- आयुर्वेदात लठ्ठपणावर काही अनुभविक उपचार आहेत. मलप्रवृत्ती साफ होत नसल्यास कपिलादी वटी सहा गोळ्या आणि एक चमचा एरंडहरीतकी चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावं. त्रिफळा गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी सहा गोळ्या अशा बारा गोळ्या दोन वेळा रिकाम्या पोटी सकाळी आणि सायंकाळी बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. पाणी पिऊनही लघवी नियमित होत नसल्यास वरीलप्रमाणे औषधं घ्यावीत.
- रसायन चूर्ण सकाळी आणि सायंकाळी एक चमचा घ्यावं. मासिक पाळीत गर्भाशयाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्यास कुमारी आसव चार चमचे समभाग पाण्याबरोबर दोन्ही जेवणांनंतर घ्यावं.
- स्थूल शरीराबरोबर गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, आमवात ही लक्षणं असल्यास त्रिफळा गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. दोन्ही जेवणांनंतर सौभाग्य सुंठ अर्धा चमचा घ्यावी. पंडुता, मुखशोध, पादशोध या तक्रारी असल्यास चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ आणि लाक्षादि गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात.
- शुद्ध गुग्गुळ गोळ्या सकाळी, सायंकाळी आणि रात्री तीन वेळा अशा सहा गोळ्या पाण्यात विरघळवून घ्याव्यात. यामुळे शरीरात उष्णता वाढते. ज्यांना मानवेल त्यांनीच घ्यावं. चांगला कात तीन ग्रॅम, गुग्गुळ दहा ग्रॅम असं सकाळ, सायंकाळ दोन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावं.
- पुरेसा घाम येत नसल्याने स्थूलपण वाढलेला असल्यास त्रिफळा, वाविडग चित्रक, नागरमोथा, दशमुळं, बाहवा, एरंडमूळ, देवदार आणि दारुहळद प्रत्येकी दोन ग्रॅम अशी एक पुडी चार कप पाण्यात उकळून त्याचा काढा एक कप उकळवून गाळावा. तो सकाळी घ्यावा. पुन्हा उरलेला चोथा सायंकाळी पाण्यात उकळून आटवावा. अर्धा कप उरल्यावर गाळून घ्यावा.
- नुसता उकडलेला दुध्या भोपळा किंचित मिरपूड टाकून घ्यावा. ज्वारीची भाकरी आणि पालेभाज्यांचं सूप यावर राहण्याचा प्रयत्न करावा. लठ्ठपणावर उपचार सुरू केल्यावर साध्या साध्या बाबतीत दक्षता बाळगल्यास त्याचा खूप उपयोग होतो. उदाहरणार्थ, भूक आणि तहान मारायला शिकावं.
- ठरवून काम, व्याप, श्रम यामध्ये सतत बुडलेलं असावं. शरीरातून भरपूर घाम निघाला पाहिजे. दुपारची झोप तर टाळावीच, पण अनुषंगाने येणारं विलासी आणि ऐषारामी जीवनही न जगण्याचा निर्धार करावा. लठ्ठपणा हा तारुण्याची हानी करणारा असतो.
म्हणून ते टिकवायचं असेल तर लठ्ठपणा शरीराचा ताबा घेणार नाही हे कटाक्षाने पाहायला हवं.
शरीरात एकूण फॅटचं प्रमाण यापेक्षाही महत्त्वाचं असतं फॅटचं शरीरात योग्य डिस्ट्रिब्यूशन. म्हणजे संपूर्ण शरीरात फॅट म्हणजेच चरबी जास्त असणे घातक नाही तर ती केवळ पोटाच्या आजूबाजूला जमा होणे जास्त घातक आहे. पुरूषांसाठी ४० इंचापेक्षा जास्त आणि महिलांसाठी ३५ इंचापेक्षा जास्त कंबरेची साइज असेल तर जाडेपणाशी संबंधित आजारांचा त्यांना सामना करावा लागतो.
पॉट बेली ओबेसिटी(जाडेपणा)
हा पोटाचा जाडेपणा आहे याला सेंट्रल ओबेसिटीही म्हणतात. यात पोटाच्या आजूबाजूला एक्स्ट्रा फॅट जमा होतं. हीच पोटावर जमा झालेली चरबी वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. टाइप- २ डायबिटीज, हाय बीपी, झोपताना श्वास घेण्याची अडचण, स्लीप एप्निया, हृदयरोग, चेहऱ्यावर एक्स्ट्रा केस आणि इनफर्टिलिटीची समस्या, काही प्रकारचे कॅन्सर या समस्या होऊ शकतात.
ही सामान्य बाब
पोटाचा जाडेपणा हा महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये जास्त बघायला मिळतो. कारण महिलांचे सेक्स हार्मोन्स पोटाच्या कॅविटीमध्ये फॅट जमा होऊ देत नाहीत. पण मोनोपॉजनंतर महिलांमध्येही पोटाच्या जाडेपणाचा धोका पुरूषांइतकाच होतो. हेच कारण आहे की, नेहमी ४० ते ४५ वयापर्यंत एकदम स्लीम दिसणाऱ्या महिला अचानक ५० वयापर्यंत पोहचताना पोट आणि हिपच्या जाडेपणाच्या शिकार होतात. लाइफस्टाइल आणि जेंडर सोबतच काही चुकांमुळे जाडेपणा येतो.
फॅट जमा झाल्यावर काय कराल उपाय?
उभारदार पोट - पोट वरून खालपर्यंत फुगलेलं असतं. हे न पचणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने होतं. म्हणजे असे पदार्थ ज्यात व्हिटॅमिन आणि मिनरल्सचं प्रमाण फार कमी असतं.
काय करावं - अशावेळी हलकी एक्सरसाइज आणि बॅलन्स डाएटने पोट सहजपणे कमी केलं जाऊ शकतं. सोबतच काही पेय घ्या ज्याने पचनक्रिया चांगली होईल. म्हणजे तुम्ही ताक, लिंबू पाणी सेवन करू शकता. याने तुमच्या पोटाचा घेर कमी होऊ शकतो.
टायर बेली फॅट - याप्रकारच्या जाडेपणात साइडने टायरच्या आकारात बाहेर येतं. पोटाचा हा जाडेपणा तासंतास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने आणि शारीरिक हालचाल होत नसल्याने होतो. अशा लोकांमध्ये गोड पदार्थ खाल्ल्याने समस्या अधिक वाढू शकते.
काय करावे - जर तुमचा जाडेपणा या कॅटेगरीमध्ये येत असेल तर सर्वातआधी अल्कोहोल आणि सोडा असलेले कोल्ड ड्रिक्स लगेच बंद करा. तसेच या समस्येपासून सुटका करून घ्यायची असेल तर हेल्दी डाएट करा आणि शारीरिक हालचालही करा. रोज साधारण १ तास ब्रिस्क वॉक करा.
लो बेली फॅट - पोट वरच्याऐवजी खालच्या बाजूने जास्त बाहेर आलेलं असतं. पोटाच्या खालच्या भागाचा जाडेपणा नेहमी एका जागेवर बसून कमा करण्याच्या सवयीमुळे आणि एकप्रकारचाच आहार सतत घेत असल्याने होतो. याप्रकारच्या जाडेपणाने पीडित लोक शरीराच्या इतर भागात स्लीम दिसतात. पण पोटाच्या खालच्या भागात फॅट जमा झाल्याने जाड दिसायला लागतात.
काय करावं - या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या दिनक्रमात एक्सरसाइजचा सहभाग करा. आहारात नेहमी वेगळेपणा ठेवा, संतुलित आहार घ्या आणि डाळिंब, गाजर, मोसंबी या फळांचं ज्यूस सेवन करा. याने पोट कमी होण्यास मदत मिळेल.
स्ट्रेस बेली - जाडेपणाच्या स्थितीमध्ये पोट खालच्या बाजूने लटकलेलं गोल दिसतं. ज्या लोकांना पचनक्रियेसंबंधी समस्या असतात त्यांना ही समस्या होते. त्यामुळे त्यांचं पोट फुगलेलं असतं.
काय करावं - या लोकांनी वेळेवर जेवण करावं, जंक फूड आणि जास्त कॅफीन म्हणजेच चहा, कॉफी, चॉकलेट ड्रिक्सचं जास्त सेवन करू नये.
जर तुमचं वजन जास्त असेल तर याचा अर्थ केवळ तुम्ही जाड आहात, असा होत नाही. जास्त वजनासोबत जास्त आजार आणि वेगवेगळ्या समस्या सोबत येतात. जसजशा तुमच्या शरीरात फॅट सेल्स वाढत जातात, तसतशी तुमची श्वास घेण्याची क्षमता कमी होते. मेटाबॉलिज्म स्तर बदलू लागतो, इंन्सुलिन वेगाने वाढू लागतो, हार्मोन्सचं नियंत्रण बिघडतं आणि या सर्व कारणांमुळे तुमचा कॅन्सरचा म्हणजेच कर्करोगाचा धोका दुप्पट वाढतो.
जाडेपणाशी संबंधित कॅन्सरचा धोका ४० टक्के
शरीरात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा खासकरून कॅन्सरचा जाडेपणाशी काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी एका हेल्थ बोर्डाने अभ्यास केला. ज्याचे निष्कर्ष सांगतात की, जाडेपणाशी संबंधित कॅन्सरचा धोका अलिकडच्या वर्षांमध्ये साधारण ४० टक्के वाढला आहे. इतकेच नाही तर तुम्ही जर जाडेपणाने ग्रस्त असाल, तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला एक नाही तर तब्बल १३ प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका अनेक टक्क्यांनी वाढतो.
६० हजार लोकांच्या तपासणीत १३ प्रकारचा कॅन्सर
यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनच्या एका अभ्यासानुसार, कॅन्सरने पीडित ज्या ६० हजार लोकांची तपासणी करण्यात आली त्यांच्यात जाडेपणा आणि वजनाशी संबंधित समस्या एका समान धाग्यामुळे आढळल्या. या अभ्यासादरम्यान ज्या रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यांच्यात १३ वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आढळून आलेत. ज्यात ब्रेन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, गॉल ब्लाडर कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, पॅनक्रियाज कॅन्सर, कोलोन कॅन्सर, यूट्र्स कॅन्सर, ओवरीज कॅन्सर यांचा समावेश होता. जाडेपणासोबतच धुम्रपानही कॅन्सर होण्याचं एक मुख्य कारण आहे.
जगाची मोठी लोकसंख्या जाडेपणाची शिकार
यात जराही शंका नाहीये की, जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक आजार आहे ज्यामुळे शरीर वेगवेगळ्या आजारांनी वेढलं जातं आणि ज्यात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचाही समावेश आहे. या अभ्यासात असे दिसून आले की, जगातले दोन तृतियांश लोक जाडेपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत आणि यात वयस्कांसोबतच लहान मुलांचाही समावेश आहे. म्हणजेच काय तर जाडेपणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
वजन कमी केल्याने कॅन्सर होणार नाही?
कॅन्सर हा केवळ जाडेपणामुळेच होतो असे नाही. याला इतरही अनेक कारणे असतात. यात वातावरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच तंबाखूचं सेवन आणि केमिकली प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टचं सेवन यामुळेही कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. पण जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक मोठी समस्या आहे. यामुळेही कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे तुम्ही केवळ चांगले आणि दिसावे म्हणून वजन कमी करणेच महत्त्वाचे नाही तर वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठीही वजन कमी करणे गरजेचे आहे.
जाडेपणाची कारणे
जाडेपणा कमी करण्यासाठी कधी कुणी डाएट करतं, कधी कुणी केवळ फळं खातं, कुणी जिम लावतं तर कुणी धावायला जातं. असे वेगवेगळे उपाय अलिकडे प्रत्येक दुसरा किंवा तिसरा व्यक्ती करताना दिसतो. इतकी ही स्थूल होण्याची समस्या गंभीर झाली आहे. याला कारणेही तितकीच वेगवेगळी आहेत. जंक फूड, जेवणाच्या अनियमीत वेळा, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, शारीरिक हालचाली कमी होणे, व्यायाम न करणे, एकाच जागी बसून काम करणे अशी कितीतरी कारणे सांगता येतील.
निरोगी राहण्यासाठी आम्हाला आपल्या आहारात फळ भाज्यांसोबत वेग वेगळ्या बियांना देखील सामील करायला पाहिजे. अशाच बियांमध्ये एक आहे अलसी (अंबाडी बिया), ज्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स असतात. हे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. अंबाडीच्या बियांपासून तयार काढ्याचे नियमित सेवन केल्याने बरेच आजार दूर होण्याची शक्यता असते.
कसा तयार करायचा काढा
दोन चमचे अलसीच्या बियांना दोन कप पाण्यात मिक्स करा आणि निम्मे होईपर्यंत त्याला उकळी येऊ द्या. तयार काढा गाळून घ्या आणि गार झाल्यावर त्याचे सेवन करावे.
याचे अनेक फायदे आहे
ब्लड शुगर नियंत्रित करणे : डायबिटीज आणि ब्लड शुगरची समस्या असणार्या लोकांसाठी अलसीचा काढा वरदान आहे. नियमित रूपेण सकाळी उपाशी पोटी असलीच्या काढ्याचे सेवन केल्याने डायबिटीजचे स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
थाइरॉएडमध्ये फायदेशीर : सकाळी उपाशी पोटी अलसीचा एक कप काढा हाइपोथाइरॉएड आणि हाइपरथाइरॉएड दोन्ही स्थितित फायदेशीर ठरतो.
हार्ट ब्लॉकेजला दूर करण्यासाठी : नियमित रूपेण तीन महिन्यापर्यंत अलसीचा काढा पिण्याने आर्टरीजमधील ब्लॉकेज दूर होतात आणि तुम्हाला एंजियोप्लास्टी करण्याची गरज पडत नाही. अलसीत उपस्थित ओमेगा-3 शरीरातील खराब कोलेस्टरॉल एलडीएलच्या स्तराला कमी करतो आणि हृदय संबंधी आजारांना रोखण्यास मदत करतात. हानिकारक विषाक्त पदार्थांना बाहेर काढून शरीराला डीटॉक्सीफाई करतात.
सांधेदुखीत आराम: साइटिका, सांधेदुखी, गुडघे दुखीत अलसीच्या काढ्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे.