बायपोलर डिसऑर्डरला मनोवस्था, वर्तणुकीतील बदल, कधी नैराश्य कधी अतिउत्साही यांच्याशी निगडी मानसिक किंवा मेंदूशी निगडित विकास मानले जाते. या मानसिक विकारात व्यक्ती काही काळ नैराश्यग्रस्त किंवा काही काळ उन्मादाच्या अवस्थेत राहतो. व्यक्तीची मनस्थिती, ऊर्जा आणि कार्यकुशलतेची पातळी प्रत्येक दिवशी बदलत राहाते. ही समस्या पुरुषांच्या तुलनेत अधिक जाणवते.
नैराश्याची अवस्था- अतिहर्ष झाल्यानंतर व्यक्ती असामान्यपणे ऊर्जावान, आनंदी किंवा खूप चिडचिड करतो. परिणामांची पर्वा न करता चुकीचे निर्णयही घेऊ शकतो. अतिहर्ष किंवा उन्मादाच्या अवस्थेत झोपेची गरज खूप कमी असते. नैराश्याच्या स्थितीमध्ये व्यक्ती विनाकारण रडू लागतो. आयुष्याकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोनही नकारात्मकच होतो. अशी व्यक्ती दुसर्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहू शकत नाही.
लक्षणे कोणती?- बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तीमध्ये असामान्य तीव्र भावना दिसतात. त्यांच्याझोपण्याच्या पद्धतीत बदल, सक्रियतेच्या पातळीत वाढ, तसेच वर्तणूकही असामान्य दिसू शकते. या परिस्थितीत मनस्थिती सातत्याने बदलत राहते. व्यक्तीची ऊर्जा पातळी, कार्यशैली तसेच झोपेच्या पद्धतीत बदल, हे सर्व व्यक्तीच्या मनस्थितीवर अवलंबून असते. याखेरीज या आजाराने ग्रस्त व्यक्तींमध्ये दुःखी, नाउमेद, ऊर्जाहीन तसेच कार्यशैलीची पातळी कमी होणे, झोप न येणे किंवा खूप जास्त झोप येणे, सतत चिंताग्रस्त राहणे, एकाग्रतेत अडचणी, विसराळूपणा, अतिभोजन किंवा कमी भोजन, थकवा, आळस, आत्महत्येचे विचार इत्यादी लक्षणे व्यक्तींमध्ये दिसतात.
अतिहर्ष किंवा उन्मादाच्या अवस्थेत या व्यक्ती विचित्रपणे अतिउत्साही आणि अतिसक्रिय असतात. अत्याधिक आनंद, जोरजोरात बोलणे, एका विचारापासून थेट दुसर्या विचारापर्यंत पोहोचणे, दुसर्याला चिडवणे, आसपासच्या वातवरणावर कमी लक्ष देणे आदी अवस्था यामध्ये असू शकतात.
कारणे कोणती- बायपोलर डिसऑर्डर होण्यास अनेक कारणे आहेत. विविध संशोधनानुसार हा आजार अनुवांशिकही असू शकतो, असे दिसून आले आहे. तसेच वातावरणाचा परिणाम, व्यक्तीगत मानसिक, मानसशास्त्रीय आणि अनुवंशिक कारणे हा आजार होण्याच्या शक्यता वाढवतात. जीवनातील काही अप्रियघटना, वाईट व्यक्तीगत नाती, लहान वयातील अत्याचार किंवा एखादा अपघात यामुळे कमी वयात ही समस्या भेडसावू शकते. त्याचबरोबर मेंदूला झालेली इजा, फिट्स, मेंदू तसेच रक्तवाहिन्यांचे आजार यामुळे देखील हा आजार जडू शकतो.
या आजाराचे योग्यवेळी निदान आणि उपचार झाल्यास पीडित व्यक्तीला आरोग्यपूर्ण आणि चांगले जीवन जगण्यास मदत होते. याच्या उपचारास उशीर करु नये कारण हा आजार आयुष्यभर तसाच राहातो. पण दीर्घकालीन सातत्यपूर्ण उपचार याची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करतात.
बायपोलर डिसऑर्डरच्या उपचारांमध्ये भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मानसिक आजार प्रतिरोधक तसेच नैराश्यावर मात करणारी औषधयोजना केली जाते. व्यक्तीगत आणि सामाजिक समन्वय थेरेपीमुळे उर्वरित नैराश्याची लक्षणे दूर करणे शक्य होते. हा आजार असलेल्या व्यक्तींची मानसिक स्थिती चांगली होत नाही, तोपर्यंत त्यांना व्यवसायासंबंधी प्रयोगशील निर्णय, कामातील बदल किंवा घरगुती समस्यांपासून लांब ठेवावे.
जेव्हा व्यक्तीची मानसिक स्थिती औषधे आणि उपचारांनी नियंत्रित होईल, तेव्हा त्यांच्या व्यक्तीगत परिस्थितींची समीक्षा करणे आवश्यक असते. जेणेकरून या व्यक्तीला होणार्या त्रासापासून, अडचणींतून बाहेरकाढण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. दीर्घकालीन उपचारामुळे या आजाराची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत होते.
काही अपवाद वगळता काहींना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन रडू येतं. पण काही असेही असतात ज्यांना विनाकारण रडू येतं. सिनेमातील एखादा इमोशनल सीन पाहून किंवा एखादा मित्र नाराज झाल्यावर काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं.
कधी-कधी काही लोक हे विनाकारण रडायला लागतात. तज्ज्ञांनुसार, विनाकारण रडणे एक चिंतेची बाब आहे. यावरुन व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रुपाने आजारी असल्याचे दिसते. पण काय कधी तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, लोक का रडतात? चला जाणून घेऊ....
कधी कधी काही लोकांना दिवसभराच्या थकव्यानंतर रडू येतं. युनिर्व्हसिटी ऑफ पेनसेल्वेनियाच्या एका रिपोर्टनुसार, रोज रात्री केवळ 4 तास झोप घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. झोप कमी झाल्यामुळे काही लोकांचा मूड बदलतो तर काही लोक उदास राहतात.
तज्ज्ञांनुसार, जास्त चिंता आणि तणावामुळे लोक लवकर रडायला लागतात. अशा लोकांना स्वत:ला सांभाळण्यासाठी दुसऱ्यांची गरज असते. अनेकदा काही मुली मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांमुळेही रडतात. तर काही लोकांना व्हिटॅमिनची कमतरता असणे, स्ट्रोक, थायरॉयडची समस्या, लो ब्लड शुगर असल्यानेही काही लोकांना रडायला येतं.
प्रत्येकाच्याच जीवनात काही अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे त्यांना रडायला येतं. पण काही लोकांना डिप्रेशनमुळेही रडायला येतं. कधी कधी काही लोकांना थोड्या थोड्या दिवसांनी डिप्रेशन येतं त्यामुळे त्यांचा ताण कमी होत नाही.
आपण आधुनिक होत आहोत, प्रगतीपथाकडे मार्गक्रमण करत आहोत. यामुळे आपल्यामध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा सुरु जली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कमी वेळात यशस्वी व्हायचे आहे. यासाठी प्रत्येकजण अनेक अडचणींना सामोरे जात प्रयत्न करत आहे. पण या सगळयामध्ये एखाद्या गोष्टीचा अधिक विचार करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत आहे. घर-परिवार, नोकरी किंवा कोणत्याही मुद्दयावर गरजेपेक्षा अधिक विचार करणे त्रासदायक ठरेल. अतिविचार किंवा चिंता यामुळे समस्या कमी होणार नाही तर उलट आजारपण वाढेल. तज्ञांनुसार, अतिविचार केल्याने आपल्या शरीरात कोर्टिसोल हार्मोन्स वाढू लागतात. ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
# अतिविचाराचा परिणाम तुमच्या कामावरही होतो. कारण कोर्टिसोल हार्मोनमुळे मेंदूच्या कनेक्टिव्हीटीवरही परिणाम होतो.
# अधिक विचार केल्याने तणाव, चिंता, मुड स्विंग्स यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. यामुळे पोटात जळजळ, बोवेल सिंड्रोम, गॅस्टिक सिक्रेशन, आतड्यांची अकार्यक्षमता यांसारखअया समस्यांना आमंत्रण मिळते.
# अतिविचार किंवा चिंता याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. छातीत दुखणे, चक्कर येणे, निद्रानाश यांसारख्या समस्या वाढतात. सातत्याने चिंता करणे, तणाव, अतिविचार याचा परिणाम त्वचेवरही होतो.
# चिंतेमुळे भावनात्मक तणाव वाढतो. त्यामुळे सोसायसिस, अटॉपिक, डर्मेटाईटिस, खाज यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. तणावामुळे शरीराला सुजही येते. रोगप्रतिकारकक्षमतेवरही याचा परिणाम होतो.
# अतिविचाराने मेंदूत कोर्टिसोल हार्मोन वाढते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा नष्ट होते. अतिविचाराने पचनक्रियेच्या समस्या, ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक डिसऑर्डर, हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो.
ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. ही समस्या कधी उग्र रुप धारण करेल हे सांगणं कठीण होतं. जोपर्यंत ताण आपल्या क्षमतेशी जुळणारे असतात तोपर्यंत ते प्रेरणादायी, आव्हानात्मक ठरतात; पण त्यापलीकडे गेले की मग मात्र आपल्या उत्पादकतेवर व कामगिरीवर परिणाम होतो, तसेच शारीरिक व भावनिक आरोग्यावरसुद्धा याचे गंभीर परिणाम होतात.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. त्यामुळे ताण, त्यातून येणारं नैराश्य हा विषय पुन्हा एका समोर आला आहे. या ताणाचं वेळीच नियोजन केलं तर नैराश्येच्या गर्तेत सापडण्यापासून माणूस वाचू शकतो. तेव्हा हा ताण म्हणजे काय? त्याचे आपल्यावर कसे परिणाम होतात? हे जाणून घेऊयात.
तणाव आल्यावर शरीरात काय बदल होतो?
ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात. जर तणाव जास्त वेळ टिकला तर कॉरटिसोल नावाचे द्रव्य दीर्घकाळासाठी निर्माण होते. अति, विचित्र आणि विशिष्ट प्रसंगानंतर या द्रव्यामुळे शरीर व मेंदूमध्ये झपाटय़ाने आणि अतिरेकापर्यंत बदल घडतात.
अनेकदा व्यक्तींमध्ये एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे असे अनेक बदल होतात.
काही व्यक्ती ताणातून बाहेरच येत नाहीत. सतत तोच विचार करतात. काहींना त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसते, त्या वेळचा त्रास पुन्हा अनुभवणे, दचकणे असे व्यक्तींसोबत वारंवार घडते. यामुळे भित्रेपणा, उदासीनता, चिडचिड वाढते.
तणाव का येतो?
बऱ्याच वेळा आपण तणावाखाली वावरतो, पण त्याचा उगमच कळत नाही व तणाव अजूनच वाढतो. खासगी तसेच प्रोफेशनल आयुष्यात येणाऱ्या समस्या या ताणाचं प्रमुख कारण ठरतात. याव्यतिरिक्तही काही कारणं आहेत ही कारणं तुम्ही शोधली तर तणावमुक्त होण्याची पहिली पायरी तुम्ही गाठलीच समजा.
तणावाचे नियोजन कसं कराल?
– जवळच्या विश्वासू सहकाऱ्याशी/कुटुंबातील व्यक्तीशी तुमच्या समस्येविषयी चर्चा करा. तो/ती कदाचित तुम्हाला समस्या कशी सोडवावी ते सांगू शकणार नाही, पण त्यामुळे तुम्हाला नक्कीच हलके वाटेल.
– आवश्यक झोप घ्या. रात्री मोबाइल, दूरदर्शन, सोशल साइटवर वेळ घालवू नका. अपुऱ्या झोपेमुळे कामगिरी सुमार होते.
– आवडत्या छंदात मन रमवा. काही नवे शिका. भटकून या
– अचूकपणाचा अतिरेक, नकारात्मक विचार व आपल्या हातात नसलेल्या गोष्टींच्या परिणामांचा विचार टाळा.
– माणूस नैराश्येत असला की या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणणं कठीण वाटतं पण एकदा का मानसिक तयारी पक्की केली नैराश्येच्या गर्तेतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणं सोप्प होतं.
अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधसोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरण शक्तीत वाढ होते.
अशोकचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्रा करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते.
शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचे योग्य विकास होते.
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरण शक्ती वाढते.
शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.
दूध,तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५० मिलीग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
१० ग्रॅम वचा पूड २५० ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते