Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.
ओवा चवीला आंबट, कडवट, उष्ण आणि थोडासा तिखट असतो. वात, तसेच कफ दोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो.ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. पाणी उकळून ओवाचा रस घ्यावा. मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे. यामध्ये तुम्ही साखरही मिसळू शकता.

छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. दात दुखीमध्येही ओवा हितकारक ठरतो. दात दुखी थांबविण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे. पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.

तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर ओवा फायदेशीर ठरतो. डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो. तर ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल.

पोटाशीच्याबाबतीत काही समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अॅलसिडीटीपासून सुटका होते. आर्थरायटीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणा-या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास उत्तम.

मुंबई : खूप कमी लोकं असतील ज्यांना फणसाची मसालेदार भाजी आवडत नसेल. काही जण फणसाचा फळ समजतात तर काही भाजी. तर अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. काही घरांमध्ये फणसाची भाजी तर होतेच तर काही जण याचं लोणचं, भजी आणि कोफ्ता देखील करतात. काहींना पिकलेला फणस देखील आवडतो.

फणस हा औषधीय गुणांनी भरलेलं पौष्टिक फळ
फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे.

डोळ्यांना अतिशय फायदेशीर
जर तुम्हाला पिकलेला फणस खाणं अतिशय आवडतं तर त्यातील गरे काढून पाण्यात उकळून ते प्या. असं केल्यामुले शरीरात एक प्रकारे उत्साह राहतो. फणसात विटामीन ए असल्यामुळे डोळ्यांना यामुळे अतिशय फायदा होतो. आणि त्वचा अतिशय चांगली होते.

हृदय निरोगी राहण्यास होते मदत
फणसात कॅलरीज नसतात. त्यामुळे फणस खाल्याने हृदयाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या समस्यांवर याचा फायदा होतो. यामध्ये पोटॅशिअम देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हृदय रोगासारख्या समस्या दूर ठेवण्यास फणस मदत करते. यामुळे हाय ब्लड प्रेशर देखील कमी होते.

हाडांच्या दुखण्यापासून मिळतो आराम
फणसाच्या गऱ्याशेजारी असलेल्या सफेद भागाचं दूध काढलं. आणि ते सूज असलेल्या किंवा कापलेल्या भागावर लावल्यास फायदा होतो. तसेच हाडांच्या दुखण्यावरही फणसाचा अधिक गुणकारी उपाय आहे.

पचनशक्ती उत्तम होते
फणसाचे सेवन केल्यामुळे अल्सर आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. फणसाच्या पानापासून बनलेल्या चुरणाचा सर्वाधिक फायदा होतो. अल्सरच्या आजाराकरता फणसाची पानं सुकवून खाणं अधिक फायदेशीर


कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कधी पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कधी पपई खाणे फायद्याचे ठरू शकते.

कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'अ', 'ई' आणि 'क' असते. ही जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. सर्दी आणि पडसे यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मूत्रसंबंधी समस्यांचेही कधी पपई निराकरण करू शकते.

शरीरावर अनेक नको असलेले केस उगवतात. हे अनावश्यक केस खराब दिसतात. दरवेळी वॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय होतो.
कच्च्या पपईत असणारे पैपिन नावाचे एंझाईम हे शक्तीवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते.

आपल्याकडे हंमागी फळे भाज्या येतात. सध्या उन्हाळा चालू आहे आणि हा हंगाम आहे कलिंगडाचा. बाजारात तुम्हाला लाल, रसदार कलिंगड पाहायला मिळतील. उन्हाळ्यात याचा आहारात भरपूर समावेश करा. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे...


-कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही. त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात.

-कलिंगड खाणाऱ्यांना हृदयासंबंधित आजार होत नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. कारण कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

-उन्हाळ्यात ऊनामुळे त्वचा खूप खराब होते. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते. कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

-कलिंगड खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे खूप वेळ काही खाल्ले जात नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

-कलिंगडात अनेक व्हिटॉमिन्स असतात. जे आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. यातील व्हिटॉमिन ए शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि डोळ्यांसाठी उत्तम ठरते.

अनेकदा लोकं हेल्दी डायटच्या नावावर कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर्ससह इतर पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. आणि भाज्या उकळून किंवा शिजवून सेवन केल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात हे खरं असले तरी प्रत्येक भाजी आपण कच्ची खाऊ शकत नाही. जाणून घ्या कोणत्या अश्या भाज्या आहे ज्या कच्च्या खाऊ नाही.
वांगी
कच्चे वांगी खाण्याचा प्रयत्न करू नये. वांग्यांमध्ये सोलानिन नामक तत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतं. कच्चे वांगी खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते. म्हणून वांगी शिजवून खावे.

गाजर
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आढळत ज्याने बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट करते. गाजर शिजवल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढतं. शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यात तसेच स्किनला पोषण मिळण्यासाठी ये आवश्यक तत्त्व आहे.
बटाटे
बटाट्यांमध्ये आढळणारे स्ट्रार्च पचण्यात समस्या बनू शकतात म्हणून बटाटे उकळून किंवा शिजवून खावे.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये आढळणारे लाइकोपीनमुळे याचा रंग लाल असतो. यामुळे प्रोस्टेट कँसर आणि हार्टच्या समस्यांपासून सुटकारा मिळतो. टोमॅटो शिजवल्यावर त्यात आढळणारे टच सेल वाल्स ब्रेक डाउन होतात आणि लाइकोपीन रिलीज करतात. यामुळे हे शरीरात शोषले जातात.
ब्रोकली
ब्रोकली आणि कोबीत कठोर घटक आढळतात. या भाज्या चांगल्यारीत्या शिजवून न खाण्याने पचण्यात समस्या येते.

बींस
बींसमध्ये फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, फोलेट्स, फोटो पोषक घटक, व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्त्व आढळतात. उकळून खाल्ल्यास हे सर्व पोषक तत्त्व आपल्याला मिळू शकतात. मधुमेहावर उकळलेले बींस उपयोगी ठरतात. 5 मिनिट बींस उकळून त्यावर मीठ आणि काळ्या मिर्‍याची पूड घालून खाऊ शकता.
पालक
पालक अनेकदा सलॅड म्हणून खाण्यात येतं. कच्चा पालक खाणे धोकादायक ठरू शकतं. पालक शिजवल्यावर त्यात आढळणार्‍या आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.

रताळे
रताळ्यांमध्ये आयरन, फोलेट, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स इतर आढळतं, याने इम्यून सिस्टम मजबूत होतं. रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे कार्बोहाइड्रेट शरीरासाठी आवश्यक असतं. याचे दुप्पट गुण मिळवण्यासाठी रताळे उकळून खावे.

Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Nandkumar  G. Patil
Dr. Nandkumar G. Patil
BAMS, Ayurveda, 35 yrs, Pune
Dr. Varun kumar  PT
Dr. Varun kumar PT
BPTh, Homecare Physiotherapist Physiotherapist, 10 yrs, Pune
Dr. Vrushali Garde
Dr. Vrushali Garde
MBBS, Psychiatrist, 11 yrs, Pune
Dr. Smita  Patil
Dr. Smita Patil
BHMS, Homeopath, 15 yrs, Pune
Hellodox
x