Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात, अनेकजण सहलींचं प्लॅनिंग करतात तर हाच काळ लग्नमौसमांचा असतो. उन्हाळ्यात प्रखर झालेलं उन तुमची भूक मंदावण्याचं कारणं असतं पण एन्जॉयमेंटच्या आनंदात अनेकदा चटपटीत आणि बाहेरचे पदार्थ खाण्याकडे तुमचा ओढा असल्यास आरोग्य बिघडू शकते. उन्हाळ्याच्या दिवसात संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे. या दिवसात डीहायड्रेशनचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच आहारात कोणते पदार्थ टाळावेत याबाबतही सतर्क राहणं आवश्यक आहे.

आईस्क्रिम सॅन्डव्हिच -
आईस्क्रिम आणि उन्हाळा हे अतुट नातं आहे. या दिवसामध्ये तुम्ही 'कूल' राहण्यासाठी घरच्या घरी आईस्क्रिम बनवू शकता. किंवा आईस्क्रिम सॅन्डव्हिचची तयारीदेखील घरी करू शकता. मात्र बाजारातील विकतचे आईस्क्रिम सॅन्डव्हिच टाळा. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स अधिक असतात.

तिखट जेवण -
तिखटाचे जेवण उन्हाळ्यात टाळावे. यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. मसाल्याच्या पदार्थांमुळे शरीरात मेटॅबॉलिझम वाढते.

मांसाहार -
जड मांसाहार उन्हाळ्याच्या दिवसात टाळावा. मंदावलेल्या पचनसंस्थेच्या कार्यामुळे पचन न झाल्यास डायरियाचा त्रास बळावू शकतो. उन्हाळ्यात मांसाहार जपूनच करावा.

तेलकट पदार्थ -
बर्गर, मीट पॅटीस, फ्राईज यासारखे तेलकट पदार्थ आहारात टाळावेत.

खारट स्नॅक-
खारट स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये MSG घटक आढळतो. यामुळे भूक आणि वजनही वाढण्याचा धोका असतो.

शिळे पदार्थ -
वारंवार गरम केलेले किंवा नेहमीच शिळे पदार्थ खाणं टाळा. उन्हाळ्यात पदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पचनाशी निगडीत काही आजार बळावण्याची शक्यता असते.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशावेळेस मुबलक पाण्यासोबतच आहारात फळभाज्या, फळांचाही योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचे आहे.
कलिंगड, टरबूज, ताडगोळा, शहाळ्याचं पाणी यासोबतच लिची खाणंही आरोग्यवर्धक आहे. लीची हे पाणीदार फळ आहे. सोबतच त्याला एक मंद सुगंध असल्याने उन्हाळ्यात लिची खाणं आरोग्यवर्धक आहे.

लिचीमध्ये आरोग्यदायी घटक -
लिची या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो.

तात्काळ मिळते उर्जा -
उन्हाळ्याच्या दिवसात थकवा येतो. अशावेळेस लिचीच्या सेवनामुळे त्यामधील नियासिन घटक शरीरातील हिमोग्लोबिन घटक निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते.

कॅन्सरशी सामना -
लीचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्युमर यांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. सोबतच लीची मधील फ्लेवोनॉईड्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक कॅन्सरचा बचाव करण्यास मदत करतात.

वजन घटवण्यास मदत
वजन घटवणार्‍यांसाठी लीची हे फळं फायदेशीर ठरतं. कपभर लीचीच्या अर्कामध्ये 125 कॅलरीज असतात. यामध्ये फॅट्स कमी असतात. फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम घटक लिचीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कपभर लीचीमध्ये 325 ग्राम पोटॅशियम घटक आढळतात. यामुळे दिवसभरातील 9% गरज पूर्ण होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक्षमता सुधारते
शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिची हे फळ मदत करते. कपभर लीचीमध्ये सुमारे 136 मिली ग्राम व्हिटॅमिन सी घटक आढळतात. नियमित लिचीच्या सेवनामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

सौंदर्य खुलवते
चेहर्‍यावर पिंपल्सचे डाग असतील त्वचा खुलवण्यासाठी लिची खाणं आरोग्यदायी ठरते. लिचीमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अ‍ॅन्टी एजिंगचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भूकेवर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. वजन घटवण्याच्या नादात उपास मार केली जाते. त्यातून अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया...

आरोग्यदायी फॅट्सचा आहार वाढवा

अनेकजण फॅटयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश कमी करतात. परंतु फॅट्समुळेच भूकेवर नियंत्रण ठेवता येतं. फॅट्समधून उर्जा मिळते. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे शोषण सुधारते. पेशींना मजबूत बनवते. त्यामुळे बदाम, अ‍ॅव्हॅकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईल यांचा आहारात समावेश करा.

फायबर्सचा आहार वाढवा

पचनक्रियेला नियमित करण्यासाठी फायबर्स महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे पाण्याचा अंश टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात हिरव्या भाज्यांचा,फळांचा समावेश वाढवा. त्यामध्ये कॅलरीजही योग्य प्रमाणात आढळतात. सलाड किंवा फळं खाण्याच्या सवयीमधून शरीराला फायबर्सही मिळतात.

प्रोटीन्सचा आहार वाढवा

तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश वाढवा. यामुळे आहार पोटभरीचा होतो तसेच त्यातील अमायनो अ‍ॅसिड भूक नियमित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी अख्या डाळी, मासे, अंडी, यांचा आहारातील समावेश वाढवा.

भूक लागल्यावर च्युईंगम चघळा

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी च्युईंग गम चघळणे हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे. यामुळे वजन कमी होत नसले तरीही कमीत कमी कॅलरीज शरीरात जातात. मात्र च्युईंगगम हे शुगर फ्री असेल याची काळजी घ्या.


मुंबई : अनेक घरांमध्ये अजूनही तांब्या-पितळ्याची भांडी जपून ठेवलेली आहेत. पूर्वी तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात प्रामुख्याने केला जात असे. मात्र आता कालानुरूप त्यामध्ये बदल झाला आहे.

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी -
तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवणं हे आरोग्यदायी समजले जाते. नियमित पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. मात्र जेवणासाठी तांब्याचा भांड्याचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

तांब्याच्या भांड्यामध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत?
पाण्याचा साठा तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवणं फायदेशीर असले तरीही दही,दूध, लिंबूपाणी यासारखे आंबट आणि अ‍ॅसिडिक पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये साठवू नका.

का ठरते त्रासदायक?
दूध, दही किंवा त्यासारखे आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्याने किंवा त्याचे सेवन करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. दह्यामध्ये कॅल्शियम,मॅग्नेशियम,प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यासारखे घटक असतात.
जेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये दह्यासारख्र पदार्थ साठवले जातात तेव्हा त्यामधील घटकांची तांब्यासोबत रिअ‍ॅक्शन होते. परिणामी हे सारे पदार्थ विषारी होतात.

कोणत्या आजाराचा धोका ?
तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकारचे पदार्थ खाणं आरोग्याला त्रासदायक ठरते. तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकराचे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास, काविळ, डायरिया, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हितकारी असलं तरीही त्यामध्ये कोणतेही कापलेले फळ साठवू नका. तसेच फळांचा रस पिऊ नका.

उन्हाळ्यात सूर्याच्या झळांमुळे अंगाची लाही लाही होते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. अशक्तपणा वाढतो. जेवढे काम करतो, त्यापेक्षा जास्त दमायला होते. घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे थकवा अधिक जाणवतो. उन्हाळ्यात भूक कमी होते आणि अपचनाचे विकार वाढतात. त्यामुळे कफविकार वाढू न देणारे, पचन वाढविणारे आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखणारे पदार्थ खायला हवेत. त्यामुळे रात्रीचे जेवण कसे असावे याविषयी थोडक्यात.

– उन्हाळ्यात रात्रीचे जेवण हलके असावे.

– जेवणात वरण -भात, तूप, लिंबू असावे.

– ज्यांना भात आवडता नाही त्यांनी पोळी भाजी, आमटी किंवा ज्वारी बाजरीची भाकरी खावी.

– शक्यतो जेवणात हिरव्या भाज्या असाव्यात.

– मूगाची खिचडी किंवा ताकही रात्रीच्या जेवणात असलं तरी चालेल.

– जेवणाच्या सुरुवातीला भाज्यांचे गरमा-गरम सूप घ्यायला हरकत नाही.

– रात्रीच्या वेळी शक्यतो मांसाहार टाळावा. जर असेलच तर तरी पचनाच्या दृष्टीने पालेभाजीही जेवणात असावी.

– साजूक तूप जेवणात वापरावं.

– जेवणानंतर लगेच आइस्क्रीम खाणे टाळावे. खायचेच असेल तर जेवण व नाश्ता यांच्या मधल्या काळात किंवा जेवण झाल्यावर किमान दीड ते दोन तासांनी खावे. आइस्क्रीम थंड असल्याने पचनक्रिया मंदावते.

Dr. Dr.Monica Rathod
Dr. Dr.Monica Rathod
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, Thane
Dr. Pradnya Shirke
Dr. Pradnya Shirke
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 17 yrs, Pune
Dr. Mahesh Mahjan
Dr. Mahesh Mahjan
BAMS, Ayurveda, 19 yrs, Pune
Dr. Komal Khandelwal
Dr. Komal Khandelwal
BAMS, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Praisy David
Dr. Praisy David
BAMS, Pune
Hellodox
x