Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या गंभीर आजारांचा थेट संबंध डिप्रेशनशी आहे. एका ताज्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, ज्या महिलांमध्ये डिप्रेशनची लक्षणे असतात, त्यांना असे आजार आजार होण्याचा धोका अधिक असतो. या रिसर्चमध्ये महिलांमध्ये आजाराच्या आधी आणि नंतर डिप्रेशनची लक्षणे यावर अभ्यास करण्यात आला.

या रिसर्च टीमचे मुख्य Xiaolin Xu यांनी सांगितले की, 'अलिकडे अनेक महिला अनेक क्रोनिक(दीर्घकाळ राहणारा जुना आजार) आजारांनी पीडित आहेत. डायबिटीस, कॅन्सर, हृदयरोग आजकाल वेगाने वाढत आहेत. आम्ही यावर रिसर्च केला की, डिप्रेशनच्या लक्षणांआधी आणि नंतर हे आजार कसे विकसित होतात'.

या रिसर्चमध्ये सहभागी ४३.२ महिलांना सांगितले की, त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणे होती. पण यातील केवळ अर्ध्याच महिलांना डिप्रेशन क्लिनिकली डायग्नोज झाला आणि त्यावर उपचार करण्यात आले. डिप्रेशनचे शिकार होण्याआधी या महिलांमध्ये क्रोनिक आजारांचा धोका १.८ टक्क्यांनी जास्त आढळला. डिप्रेशन दरम्यान सुद्धा महिलांमध्ये हे आजार सामान्य महिलांच्या तुलनेत २.४ टक्के जास्त रिक्स बघितली गेली.

या रिसर्चमधून हे आढळून आले की, डिप्रेशन आणि दीर्घकालीन आजारांचा समान जेनेटिक किंवा शारीरिक कारणांशी संबंध आहे. रिसर्चनुसार, शरीरात सूज, डिप्रेशन आणि आजार दोन्हींशी संबंध ठेवतं. डायबिटीस आणि हायपरटेंशनसारखे आजारही डिप्रेशनशी संबंधित आहेत.


(Image Credit : Bridges to Recovery)

या रिसर्चमधून समोर आलेले परिणाम आता मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचारासाठी मदत करतील. या रिसर्चमधून ही बाब सुद्धा समोर आली की, ज्या महिलांमध्ये डिप्रेशन आणि आजार दोन्ही गोष्टी होत्या, त्या महिला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील होत्या. तसेच त्या लठ्ठपणाच्या शिकार होत्या, तंबाखू आणि मद्यसेवन करत होत्या.

सध्याचं धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताण यांमुळे अनेक लोकांना तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या उद्भवते. अनेकदा यापासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. पण यांसारख्या अनेक समस्यांवर तुम्ही घरच्या घरी स्वतःच उपचार करू शकता. यामुळे तुमचा ताण कमी होतोच पण त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही वाढतो. यासाठी तुम्हाला ध्यान करणं आवश्यक आहे. फक्त 10 मिनिटांमध्येच तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

आपण अनेकदा दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या तणावांचा सामना करत असतो. अशातच अनेक नकारात्मक विचारांची डोक्यामध्ये गर्दी होते. पण अशा समस्यांना दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून सल्ला घेणं आवश्यक नाही. असं आम्ही नाही सांगत आहोत, तर हे एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. कॅनडामधील वाटरलू यूनिवर्सिटीच्या संशोधकांच्या एका टिमने सांगितले की, दररोज फक्त 10 मिनिटांसाठी ध्यान केल्याने सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच तणावाबाबत जागरूकता पसरवल्यानेही यापासून सुटका करण्यासाठी मदत मिळते.

वाटरलू यूनिवर्सिटीचे संशोधक मेंग्रान शु यांनी सांगितले की, संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांमधून असं सिद्ध झालं की, ध्यान केल्यामुळे तणावामध्ये असलेल्या लोकांच्या विचारांमध्ये परिणाम घडून येतो. नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होते. तसेच एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणं शक्य होतं.

तणावाने पीडित असणाऱ्या 82 लोकांवर हे संशोधन करण्यात आले. या संशोधनांतर्गत सहभागी व्यक्तींना कम्प्यूटरवर काम करण्यास सांगण्यात आले. ज्यामध्ये असं आढळून आलं की, आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याच्या त्यांच्या क्षमतेमध्ये काही अडथळे येत आहेत. त्यानंतर संशोधकांनी सर्व लोकांना दोन गटांमध्ये विभागले आणि एका गटाला गोष्ट ऐकण्यास सांगितले तर दुसऱ्या गटाला थोड्या वेळासाठी ध्यान लावण्यासाठी सांगितले. त्यावेळी ज्या गटाला ध्यान लावण्यास सांगितले होते त्यांच्यावर चांगला प्रभाव दिसून आला होता.

तणावामुळे काय होतं नुकसान?

तणावामुळे तुमची विचार करण्याची, समजून घेण्याची प्रक्रिया प्रभावित होते. याच्या सामान्य लक्षणांमध्ये सतत डोकेदुखी, वजन कमी-जास्त होणे, झोन न येणे, जेवण योग्य प्रमाणात न होणे, सतत आजारी पडणे, लक्ष केंद्रीत न करु शकणे, मूड स्विंग होणे आणि हायपरअॅक्टिव किंवा ओव्हर सेन्सीटीव्ह होणे. काही वेळी हे डिप्रेशनही असू शकतं.

आजकाल अनेक लोक ऑफिसमध्ये कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे डिप्रेशनचे शिकार होतात. टार्गेटचा वाढता दबाव आणि नोकरी टिकवून ठेवण्याची चिंता यामुळे जास्तीत जास्त लोक स्ट्रेसमध्ये राहू लागले आहेत. आणि सतत स्ट्रेसमध्ये राहिल्याने अनेकजण डिप्रेशनच्या जाळ्यात येतात. अशात त्यांचं ना कामात लक्ष लागत ना घरात.

अनेक चांगल्या कंपन्या ऑफिसमध्ये आपल्या स्ट्रेसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काऊन्सिलिंगची सुविधा देतात. जेणेकरुन कर्मचारी नॉर्मल व्हावेत आणि त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं. पण अशी सुविधा देणाऱ्या कंपन्या फार कमी आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी ऑफिस स्ट्रेस दूर करण्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. याने तुम्हाला स्ट्रेस दूर करण्यास आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यास मदत मिळेल.

संवाद साधा -

तुम्हालाही ऑफिसमधील कामामुळे किंवा वातावरणामुळे स्ट्रेस येत असेल किंवा तुम्ही तणावात असाल तर एकटं राहण्याऐवजी तुम्ही जवळच्या मित्रांशी बोला. अनेकदा वेगवेगळ्या समस्या केवळ कुणाशी संवाद साधल्यानेही सुटू शकतात. तुमच्या मित्राला तुमच्या अडचणींबाबत सविस्तर सांगा आणि यातून बाहेर येण्याचा उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

फिरायला जा -

सतत टेन्शनमध्ये काम केल्यानंतर थोडा ब्रेक घेणंही गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही नोकरी टिकवण्यासाठी किंवा बॉस काय म्हणेल म्हणून सुट्टीच घेत नसाल तर तुम्ही चूक करताय. शरीर एकप्रकारे मशीनसारखं काम करुन थकत असतं. त्यालाही आरामाची किंवा रिलॅक्स होण्याची गरज असते. त्यामुळे काही दिवस सुट्टी घेऊन कुठे फिरायला जा. याने तुम्हाला शांत वाटेल आणि तुम्ही स्ट्रेसपासूनही दूर रहाल.

आवडीची नोकरी करा -

अनेकजण ते करत असलेल्या नोकरीबाबत किंवा कामाबाबत खूश नसतात. आणि हेच त्यांच्या डिप्रेशनचं, सतत तणावात राहण्याचं मुख्य कारण असतं. अशात तुम्हाला तुम्ही करत असलेलं काम पसंत नसेल तर तुम्हाला जे आवडतं ते काम करा. जे तुम्हाला आवडतं ते कराल ते कामही चांगलं होईल आणि तुम्हालाही चांगलं वाटेल. अर्थात तुम्ही डिप्रेशनपासून दूर रहाल.

चांगले मित्र करा -

अनेकदा आपले वाईच मित्रच आपल्या डिप्रेशनचं कारण ठरतात. त्यामुळे वाईट मित्रांना दूर करुन चांगले, सतत आनंदी राहणारे आणि सकारात्मक मित्र बनवा. सतत दु:खी किंवा नकारात्मक मित्रांमुळे तुमचाही स्ट्रेस वाढू शकतो. त्यामुळे स्वत:हून पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यापेक्षा चांगल्या मित्रांचा पर्याय शोधलेला बरा.

प्रोफेशनलची मदत घ्या -

जर वर सांगितलेल्या उपायांनंतरही तुमची स्ट्रेसती किंवा डिप्रेशनची समस्या दूर होत नसेल तर अशावेळी जराही वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा प्रकरणांमध्ये जराही उशीर केल्याने समस्या अधिक वाढू शकते आणि तुम्ही एखाद्या गंभीर मानसिक रोगाचे शिकार होण्याचाही धोका असतो.

डिप्रेशनमुळे आमच्या शरीराला फारच नुकसान होत. यामुळे शरीरात पित्त, कफ आणि वातीचे असंतुलन होऊन जाते. त्याशिवाय अॅलर्जी, अस्थमा, हाय कोलेस्टरॉल आणि हायपरटेंशन सारख्या समस्या डिप्रेशनमुळे जन्म घेतात. काही आयुर्वेदिक औषधींचे सेवन केल्याने तुम्ही तणावापासून लगेचच मुक्ती मिळवून घेता. तर जाणून घेऊ अशा कोणत्या हर्बल औषधी आहे ज्या तणावाला दूर करण्यास मदत करतात.

ब्राह्मी
ब्राह्मी तणाव उत्पन्न करणार्‍या हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्याचे काम करतो. ब्राह्मी मस्तिष्काला शांत करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यात फारच मदतगार सिद्ध होतो.

भृंगराज
भृंगराज चहा मस्तिष्काला निरंतर अॅनर्जी देण्याचे काम करते. यामुळे मस्तिष्कामध्ये रक्त संचारणं व्यवस्थित होतो. हे डोक्याला शांत ठेवतो तसेच पूर्ण शरीराला आराम देतो.

जटामासी
जटामासी एंटी स्ट्रेस हर्बच्या रूपात फारच लोकप्रिय आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या जडांचा वापर औषधीच्या स्वरूपात केला जातो. ह्या जडा आमच्या मस्तिष्क आणि शरीराला टॉक्सिन्सहून मुक्त करतात. व ब्रेन फंक्शन्सला दुरुस्त करण्यात मदतगार ठरतात.

अश्वगंधा
अश्वगंधा एमीनो ऍसिड्स आणि व्हिटॅमिनचा फारच उत्तम संयोजन आहे. अश्वगंधा डोक्यात एनर्जीला बूस्ट करणे व स्टॅमिना मजबूत करण्यात मदतगार ठरतो.

अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझील, इंडोनेशिया या देशांतील कर्मचार्‍यांपेक्षा भारतातील 89 टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याचा एक अहवाल समोर आला असून हे सर्वेक्षण सिग्राने समोर आणले आहे. सिग्रा 360च्या सर्वेक्षण अहवालात 89 टक्के भारतीय कर्मचारी तणावग्रस्त असल्याचे सांगितले आहे. कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आणि आर्थिक चणचण अशी दोन प्रमुख कारणे भारतात तणावाखाली असण्याची आहेत.


भारतातील 89 टक्के कर्मचारी या दोन कारणांमुळे तणावाखाली काम करतात असेही या सर्वेक्षणात समोर आले आहे. भारतातील कर्मचारी जगाच्या तुलनेत जास्त तणावात काम करतात. त्याचबरोबर आपले भविष्यात कसे होणार? हा प्रश्र्नही भारतीयांना मोठ्या प्रमाणावर सतावतो. आपले आरोग्य कसे चांगले राहील? माझे कुटुंब कसे सुखात राहील? मी माझी पत सामाजिक स्तरावर कशी सांभाळेन? काम आणि पैसा यांचे नियोजन कसे करेन? या प्रश्र्नांनी भारतीयांना भंडावून सोडलेले असते.

त्याचबरोबर या अहवालात भारतातील 18 ते 34 या वयोगटातील वर्ग सर्वाधिक तणावाखाली असतो असेही नमूद केले आहे. 95 टक्क्यांपर्यंत 18 ते 34 या वयोगटात तणावाचे प्रमाण असते असेही स्पष्ट आहे. सिग्राने हा अहवाल तयार करण्यासाठी 14 हजारांपेक्षा जास्त ऑनलाइन मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमध्ये 23 देशांमधील लोक सहभागी होते. ज्या भारतीयांनी या मुलाखतींमध्ये सहभाग घेतला होता त्यापैकी 75 टक्के लोकांनी आपण तणावाखाली का असतो याची विविध कारणे दिली. काहींनी बोलण्यास नकार दिला.

Dr. Jyoti Shinde
Dr. Jyoti Shinde
BHMS, Diabetologist Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Jyoti Sharma
Dr. Jyoti Sharma
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Dr. Kedar Wani
Dr. Kedar Wani
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 2 yrs, Pune
Dr. Manoj Rahane
Dr. Manoj Rahane
BHMS, Homeopath, 13 yrs, Pune
Dr. Aarti Vyas
Dr. Aarti Vyas
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Hellodox
x