Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.

1. मश्रुममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.

2. मश्रुममध्ये उपस्थित तत्त्व रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मश्रुममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला उत्तम बनवतो.

3. मश्रुम विटामिन डी चा चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मश्रुमाचे सेवन नियमित केले तर आमच्या आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी आम्हाला मिळून जात.

4. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.

5. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.
त्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही स्टडीत असे आढळून आले आहे की मश्रुमच्या सेवनामुळे कँसर होण्याची आशंका कमी असते.

हायपर टेंशनशी लढत असलेले लोक, आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये जर थोडेही बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. तसेच औषधांचे देखील सेवन करावे लागणार नाही.

डॉक्‍टर्सचे मानने आहे की हायपर टेंशनने लढत असणारे लोक, नियमित रूपेण सक्रिय राहिल्या पाहिजे, फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रयत्न असा असायला पाहिजे की मीठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये
प्राकृतिक उपायम्हणजे वेलची आहे. हो खरच आहे, वेलची फक्त स्वादच नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.

वेलचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील वेलचीची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही वेलचीचा वापर करू शकता. पाचन क्रियेल दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते.

ज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार वेलचीचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.

घाबरू नका, पण काळजीही घ्या!

डॉक्टरांकडे तुम्ही रोजच्या तपासणी गेलेले असताना मध्ये जर तुमचे ब्लडप्रेशर वाढलेले मिळाले तर काय करावे? ब्लडप्रेशर वाढलेले आहे, म्हणून घाबरुन जाऊ नये. कारण ब्लडप्रेशर वाढले आहे,म्हणजे लगेच तुम्हाला काही त्रास झाला; असे सहसा होत नाही.मात्र त्याकडे दुर्लक्ष मात्र अजिबात करु नये. महत्त्वाचे म्हणजे “आत्ता मी चालून आलो म्हणून, आज जरा ऑफ़िसमध्ये वादावादी झाली म्हणून, आज घरी थोडे भांडण झाले म्हणून ब्लडप्रेशर वाढले असेल ’, अशाप्रकारे या किंवा त्या कारणामुळे ब्लडप्रेशर वाढले असेल असे तर्क लढवत बसू नका.
आता प्रश्न हा आहे की खरोखरच तुम्हाला उच्च-रक्तदाबाचा (हाय-ब्लडप्रेशरचा) त्रास आहे का?

एकाच तपासणीमध्ये रक्तदाब वाढलेला मिळाला म्हणून सहसा उपचार सुरु केला जात नाही. अर्थात ब्लडप्रेशर मर्यादेच्या बाहेर वाढलेले असेल ; म्हणजे सिस्टॉलिक(वरचा आकडा) १८०च्या वर आणि डायस्टॉलिक (खालचा आकडा) १२० च्या वर असेल; तर मात्र ताबडतोब उपचारांची गरज लागेल. कसेही असले तरी तुम्हाला त्वरित औषधांची गरज आहे वा नाही याचा निर्णय तुमचे डॉक्टर घेतीलच.

अन्यथा एकाच वेळी ब्लडप्रेशर तपासून तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण आहात, हा निर्णय घेता येत नाही. तुम्हाला हाय-ब्लडप्रेशरचा त्रास आहे, हे निश्चित करण्यासाठी नियमितपणे काही दिवस ब्लडप्रेशर तपासायला हवे. आपल्याला खरोखरच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे का याची खात्री करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या वेळी म्हणजे कधी सकाळी तर कधी सायंकाळी, तर कधी उशिरा रात्री याप्रकारे काही दिवस ब्लडप्रेशर तपासावे. कारण ब्लडप्रेशर कोणत्या वेळी वाढते व कोणत्या वेळी वाढत नाही हे जाणून घेणे उपचाराच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. तसेच ब्लडप्रेशर वेगवेगळ्या जागी; कधी एका डॉक्टरांकडे तर कधी दुस~या डॉक्टरांकडे किंवा शक्य असल्यास कधी घरी सुद्धा तपासावे.

नियमितपणे ब्लडप्रेशर तपासल्यानंतर जर ब्लडप्रेशर वाढलेलेच मिळत असेल तर मात्र आपल्या भविष्यासाठी (खरं तर जीवितासाठीच) ती धोक्याची घंटा वाजली आहे असे समजून उपचाराकरिता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, कारण उपचार न केलेला उच्च रक्तदाब हे अनेक गंभीर आजारांमागचे मूळ कारण असते.

मुंबई : जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्ताने २० ते ३० या वयोगटातील तरुणांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यातून असे दिसून आले की, तब्बल ४३ टक्के तरुणांना रक्तदाबाची सामान्य पातळी माहीतच नसते. गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाब आणि त्याच्याशी संबंधित आजार असलेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असूनही तरुण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

या सर्वेक्षणानुसार ३० ते ६० या वयोगटातील ३० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. आॅनलाइन सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५०० व्यक्तींपैकी १९४ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यापैकी २४ व्यक्ती २०-३० या वयोगटातील आणि १५० व्यक्ती ३० ते ५० या वयोगटातील होत्या. यांच्यापैकी केवळ २३ व्यक्ती दर महिन्याला त्यांचा रक्तदाब तपासून घेतात. रक्तदाबाची सामान्य पातळी ९० ते १४० आहे आणि ५०० जणांपैकी केवळ २१८ व्यक्तींनाच ही आकडेवारी माहीत होती.

याविषयी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी यांनी सांगितले की, आजच्या विकसनशील देशांमध्ये जीवनशैली, ताण, कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण आणि खानपानाच्या सवयी बदलल्या पाहिजेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडी तरी शिस्त पाळणे आवश्यक आहे.

मुंबई : ब्लड प्रेशरची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. जेव्हा रक्तवाहिन्यातील प्रेशर 140/90 तेव्हा हायपरटेंशन होते. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका दुप्पट-तिप्पट वाढतो. वजन, हाय बीपी झाल्याने रक्त वाहिन्यांवर दबाव पडतो आणि त्या आकुंचित पावतात. त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. ब्लड प्रेशर हा मोठा आजार नसला तरी अनेक गंभीर आजारांचे मुळ आहे.

ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे
-वजन वाढणे
-व्यायाम न करणे
-अंनुवंशिक
-सातत्याने तणावात राहणे
-धुम्रपान
-थॉयराईड, ट्युमर सारखे आजार

किती असायला हवा बीपी?
नार्मल बीपी साधारण 120/80 पेक्षा कमी असायला हवे. यावरील स्टेजला प्री-हायपरटेंशन म्हणतात. बीपी 120 ते 139, 80 ते 89 च्या मधल्या स्थितीत असल्यास ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. 140/90 या स्थितीला हायपरटेंशन म्हणतात. जे सर्वात गंभीर आहे.

कधी तपासावा बीपी?
४० शीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ब्लड प्रेशर तपासणे गरजेचे आहे. नॉर्मल असले तरी दर ६ महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे.

त्यावरील उपाय
-रोज ४५ मिनिटे व्यायाम करा.
-चाला, जॉगिंग करा.
-आहारातील मीठाचे प्रमाण कमी कराय
वजन नियंत्रित ठेवा.
-स्वतःच्या छंदासाठी वेळ काढा. तुमच्या आवडीचे काम करा.
-फळे आणि हाय फायबर असलेले पदार्थ अधिक खा.
-फास्ट फूड, तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ, पॅक्ड फूड खाणे टाळा.

Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Ravindra Borade
Dr. Ravindra Borade
BAMS, Allergist Ayurveda, 11 yrs, Pune
Dr. Anjali Awate
Dr. Anjali Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Bharat Oza
Dr. Bharat Oza
BAMS, General Surgeon Proctologist, 9 yrs, Pune
Dr. Ajita Garud-Shinde
Dr. Ajita Garud-Shinde
MS - Allopathy, Ophthalmologist Eye Specialist, 4 yrs, Pune
Hellodox
x