Idaho:- Bubonic plague is one of three types of plague caused by the bacterium Yersinia pestis.It is passed to humans by the bite of an infected flea, which can be spread far and wide by hitching a ride on small animals.
Y. pestis resides in some animal populations — such as ground squirrels — in the United States, but it is very rare to see it passed to humans.
This most recent case occurred in a 14-year-old boy in Elmore County, ID. At this stage, it is not clear whether the child — who has remained anonymous — contracted the disease in his home state of Idaho or during a recent trip to Oregon.
However, according to officials, ground squirrels near the child's home had tested positive for Y. pestis in both 2015 and 2016.
An unusual occurrence
The news was initially broken by Elmore County Central District Health Department (CDHD). In their statement, they make it clear that this is not an emerging pattern of infections, saying:
"Since 1990, eight human cases were confirmed in Oregon, and two were confirmed in Idaho."
This is the first case of bubonic plague in the state for 26 years and only the fifth since 1940. The press release continues, "Symptoms of plague usually occur within 2–6 days of exposure and include sudden onset of fever, chills, headache, and weakness."
"In most cases, there is also a painful swelling of the lymph nodes in the groin, armpit, or neck."
In the Middle Ages, the plague descended on Europe. It is known as the Black Death, and it killed an incredible one third to one half of the continent's population.
With medical advancements today, the disease can be treated. The Elmore County CDHD news release provides us with a dash of comfort, saying that "[p]rompt diagnosis and appropriate antibiotic treatment can greatly reduce the risk of death."
Safety precautions
Importantly, the CDHD also offer some advice to help minimize the risk of contracting plague. They explain signs to look out for in pets:
"Plague signs in cats and dogs include fever, lethargy, and loss of appetite. There may be a swelling in the lymph nodes under the jaw."
If you are in the area, they offer further detailed advice:
Don't touch wild rodents or their dead bodies.
Keep pets from roaming and hunting rodents — when an animal dies from the plague, the fleas leave the body to look for a new host.Ask a veterinarian about flea control before visiting areas where ground squirrels are common.
If you find a number of dead ground squirrels, you should report it to the Idaho Department of Fish and Game.
Don't feed rodents.
Clean up areas near the home where rodents might live.
Store hay, wood, and compost as far from the home as possible.
Don't leave pet food and water where rodents can access it.
Although bubonic plague is considered to be a disease of the distant past, in some parts of the world it does, occasionally, rear its ugly head. For instance, in 2017, there was a 4-month long outbreak in Madagascar. There were around 2,300 suspected cases and over 200 deaths.
According to Sarah Correll, an epidemiologist with the CDHD, "The great news is the child is recovering and received appropriate antibiotic treatment."
Medical News Today contacted the CDHD to inquire about the boy's recovery and any other updates. We were told:
"The child is continuing to do well and recovering at home. We do not know yet if the disease was contracted in Oregon or Idaho."
- Garlic: Garlic can destroy any infection easily. It contains many antifungal, antibacterial properties which soothe the infection naturally. In fact, raw garlic has the ability to fight candida bacteria easily. So, eat 3-4 cloves of garlic for the entire day. You can eat them raw, or cook whatever you feel better.
- Papaya: It is a very helpful food when it comes to soothing the yeast infection naturally. The leas and the seeds of papaya can kill the bacteria like candida, nix etc. Moreover, papaya has a lot of vitamin C which will be great for your health and soothes many infections.
- Oregano herb: Your favourite pizza/pasta seasoning hern oregano can be great to prevent yeast infection. It can prevent many types of fungi, including Candida albicans, which is the cause of around 90% of yeast infections. Other than that, this herb comes under healing herbs which are important for your entire health.
- Coriander: It is a great plant which has benefited compounds on its leaves, seeds and in the stem also. It is a great source of are a good source of fibre, copper, iron, manganese, and magnesium which all are important to kill any bacteria inside your body and to soothe the infected area.
- Olive oil: It has antifungal, antibacterial properties which can kill candida and other bacteria very easily. It has oleuropein which stimulates your immune system’s own response to a Candida albicans infestation. But make sure you use extra virgin olive oil on your cooking.
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान शहरात आढळला. चीनमधल्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून सर्वाधिक रुग्ण येथेच आढळले आहेत. चीन सरकारकडून या व्हायरसपासून बचाव होण्यासाठी विविध पावलं उचलली जात आहेत. लोकांना मास्क लावूनच बाहेर पडण्याचं सांगण्यात आलं आहे. वुहानमधील अनेक ठिकाणी प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
काय आहेत कोरोना व्हायरसची लक्षणं -
जलद गतीने पसरणाऱ्या या व्हायरसमुळे सुरुवातीला ताप येणं, सुका खोकला, नाक गळणं त्यानंतर अशीच परिस्थिती राहिल्यास काही दिवसांनी श्वास घेण्यास त्रास होणं, थकवा येणं ही साधारण लक्षण असल्याची माहिती मिळत आहे. अधिक गंभीर प्रकरणात, न्यूमोनिया, किडनी फेल यांसारखी स्थिती देखील निर्माण होऊ शकते. या व्हायरसमुळे सर्वात आधी फुफ्फुसं प्रभावित करत असल्याचं समोर आलं आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसवर अद्याप कोणताही ठोस उपाय नाही. डॉक्टर या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला, त्याच्या लक्षणांच्या आधारेच उपचार करत आहेत.
काय काळजी घ्याल -
- साबण आणि पाण्याने हात स्वच्छ ठेवा
- शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवा
- सर्दी, ताप झालेल्यांपासून शक्यतो लांब राहा
- जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून दूर राहा
- कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं मांस खाणं टाळा
- बाहेर पडताना मास्क घाला
- खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या
या व्हायरसची लक्षण दिसल्यास -
जागतिक आरोग्य संघटनेने रुग्णालय, डॉक्टर आणि आरोग्य कामगारांना विशेष सल्ला दिला आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची त्वरित चाचणी करावी. संसर्गाच्या दृष्टीने, रुग्णाला सौम्य, मध्यम किंवा तीव्र म्हणून वर्गीकृत केले जावे.
आरोग्यसंबंधी कामगारांना या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. रुग्णालयात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी गाऊन, मास्क, हातमोजे वापरावेत. याशिवाय रुग्णालयात संक्रमित रुग्णांना वेगळं ठेऊन, रुग्णांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेली मेडिकल उपकरणं संपूर्ण स्वच्छ ठेवावी, रुग्णाला तपासल्यानंतर हात स्वच्छ करावेत.
नॉटिंगम यूनिव्हर्सिटीचे वायरोलॉजिस्ट प्राध्यापक जोनाथन बॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अतिशय नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांमधूनच, मनुष्यापर्यंत पोहचला असल्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. हा व्हायरस एका प्रजातीमधून, दुसऱ्या प्रजातीकडे संक्रमित होऊन नंतर मानवी शरीरात संक्रमित होत असल्याची शक्यता आहे.
या व्हायरसची सुरुवात चीनमधल्या वुहानमधून झाली असली तरी आता याचा संसर्ग चीनसोबतच इतर देशांमध्ये झाला आहे. थायलंडमध्ये २ जण, जपानमध्ये एकाला, अमेरिकामध्ये एकाला आणि दक्षिण कोरियातही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. नववर्षासाठी चीनमध्ये आलेल्या विविध देशातील लोकांना, यावेळी संसर्ग होऊन तो इतर देशांमध्येही पसरला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास ३०० जणांचा बळी गेला आहे.
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. त्यानंतर पुन्हा केरळमध्येच याचा दुसरा रुग्ण आढळला आहे.
कोरोना व्हायरस वेगाने पसरु लागल्यानंतर भारतीय सरकारने वुहान येथे भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी एअर इंडियाच्या विमानातून भारतीयांना दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं आहे.
देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना वायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.
पू होणे :
आपल्याला अपघातात जखम झाली आणि त्यावर योग्य उपचार नाही केले गेले किंवा वेळेवर उपचार नाही झाले तर त्यात पू होतो. जखमेतील जंतुंमुळे सेप्टीक किंवा पू होतो. ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना असा पू होण्याचा धोका अधिक असतो.
जखम झाली किंवा ती चिघळली की त्यात पू होतो. पण काहीवेळा शरीरातंर्गत अवयवांमध्येही पू होतो. पू होणे या स्थितीकडे तीन पायर्यांमध्ये पाहिले जाते. जखम झाली, त्यात पू होणे, तो बरा न होता पसरून अवयव बधीर होणे आणि रक्तदाब कमी होणे. त्यामुळे जखमेत पू झाल्यास गंभीर स्थिती येण्याआधीच वेळीच त्यावर उपचार होण्याची आवश्यकता असते. जखमेतील पू हा संसर्गजन्य आजार नाही पण ज्यामुळे पू झाला आहे त्या जीवाणूंचा संसर्ग दुसर्या व्यक्तीला होऊ शकतो.
लक्षणे : आपल्या शरीरात किंवा जखमेत पू झाला असेल तर शरीर काही लक्षणांनी आपल्याला सुचित करण्याचा प्रयत्न करीत असते ते समजून घ्यायला हवे.
1) शरीराचे तापमान 38.3 अंशांवर जाते किंवा ते 36 अंशाच्या खाली असते.
2) हृदयाचे ठोके प्रति मिनिट 90 इतके वाढतात.
3) एका मिनिटात वीस वेळा श्वास घ्यावा लागतो.
गंभीर सेप्सिस : आपल्या शरीरात पू झाला असेल आणि स्थिती गंभीर आहे की नाही हे दर्शवणारी काही लक्षणे आपल्यामध्ये दिसतात का त्याकडे लक्ष द्या. कदाचित गंभीर स्थितीमुळे एखादा अवयव निकामी होऊ शकतो.
मूत्रविसर्जनाचे प्रमाण कमी होते. मेंदूच्या स्थितीत विचित्र बदल होणे रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे श्वसनास त्रास होणे हृदयाची विचित्र धडधड होणे
पोटात दुखणे-
सेप्टीक शॉक : सेप्टिक शॉक या स्थितीचे निदान होण्यासाठी पू होण्याच्या गंभीर परिस्थिती लक्षणे आणि चिन्हे दिसून येतात. यात रक्तदाब खूप कमी होतो शिवाय पेयपदार्थ दिले तरीही शरीर त्याला प्रतिसाद देत नाही.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
बर्याचदा पू होणे या समस्येची गंभीर स्थिती रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांबाबत प्रकर्षाने जाणवते. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर किंवा गंभीर परिस्थिीत आयसीयूमध्ये ठेवलेले असते त्यांच्यामध्ये सेप्सिस किंवा पू होण्याचा सर्वाधिक संभव असतो. त्यामुळे आपल्याला जर संसर्ग झाला असेल किंवा शरीरावर तशी काही लक्षणे दिसून येत असली आणि शस्रक्रियेनंतर पू झाल्याची लक्षणे दिसत असतील तसे रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यावर संसर्ग झाला असेल तर लगेचच डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी.
कारणे कोणती?
मुळातच पू होणे हे जीवाणू, विषाणू किंवा बुरशी यांच्यामुळे घडते. याखेरीज न्युमोनिया, पोटातील संसर्ग, मूत्राशयाचा संसर्ग, रक्तातील संसर्ग यांमुळेही पू होऊ शकतो.
पू होण्याचे प्रमाण अधिक असण्याची काही कारणे असतात ती समजून घेतली पाहिजेत.
* कमजोर प्रतिकार शक्ती : एचआयव्ही, कर्करोग किंवा ट्रान्सप्लांट करतानाची औषधे या सर्व कारणांमुळे माणसाची प्रतिकार शक्ती कमजोर होते.
* औषधाला प्रतिकार कऱणारे जीवाणू : बर्याचदा शरीराला औषधाची सवय झाल्याने जीवाणू औषधाला दाद देईनासे होतात. अशाच जीवाणूंमुळे शरीरात संसर्ग वाढतो आणि सरते शेवटी पू होण्यास ते जबाबदार ठरतात.
* ज्येष्ठांमध्ये प्रमाण अधिक : ज्येष्ठ नागरिकांनामध्ये सूज येण्याचे प्रमाण वाढते तेव्हा सूज आल्यानेही सेप्सिस होण्याचा धोका असतो. त्यामुळे पासष्ट वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना सूजेमुळे पू होण्याचा धोका असतो.
* गुंतागुंत कशामुळे? : सेप्सिस मध्ये गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. खरेतर अगदी प्राथमिक अवस्था ते गंभीर अशी अवस्था निर्माण होते. पण अति पू झाल्याने शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांच्या रक्तपुरवठ्यावर नक्कीच परिणा होतो. हृदय, मेंदू आणि मूत्राशय यांना रक्तपुरवठा न झाल्यास त्यांचे क्षमता कमी होते. त्याशिवाय काही वेळा अवयवांमध्ये रक्ताच्या गुठळ्याही निर्माण होतात. त्यामुळेही रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन गँगरिन होऊन तो अवयव निकामी होऊ सखतो.
जखमेत पू होणे ही तशी वरवरची समजली जाणारी गोष्ट वाटते पण त्यामुळे शरीरात संसर्ग होऊन मृत्यूही ओढवू शकतो. पू होण्याची अतिगंभीर परिस्थिती पन्नास टक्के मृत्यूला कारणीभूत ठरते. त्याशिवाय शरीरात सतत पू होत असेल तर भविष्यात संसर्ग होण्याची शक्यता वाढतेच
धोकादायक घटक :
पू होणे ही साधीशीच सगळीकडे आढळणारी गोष्ट आहे पण ती खूप गंभीर आणि धोकादायक होऊ शकते. आपल्या प्रतिकार शक्तीकडे दुर्लक्ष केले असेल. आजारी असून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल असाल शरीरावर भाजणे, जखम असेल.
घटसर्प
घटसर्प हा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग असून त्यामुळे घसा व टॉन्सिल्स यांचा संसर्ग होऊन त्यावर तयार झालेल्या पडदयामुळे श्वासास अडथळा तसेच मृत्यु होऊ शकतो. लहान मुलांमध्ये घटसर्प नावाचा एक गंभीर आजार येऊ शकतो. या सांसर्गिक आजाराची सुरुवात बारीक ताप, अंगदुखी, घसादुखी या लक्षणांनी होते. यात घशात किंवा टॉन्सिलवर पांढरट करडा पडदा तयार होतो. तो काढण्याचा प्रयत्न केल्यास तिथून रक्तस्राव होतो. यात ब-याचदा घशात अवधाण येऊन गळा सुजतो, गिळण्याची क्रिया मंदावल्याने तोंडातून लाळ गळत राहते. या आजारात हृदय, मेंदू, इत्यादी अवयवांवर जंतूंच्या विषाचा परिणाम होऊन मूल दगावण्याची शक्यता असते. सध्या तिहेरी लसटोचणी कार्यक्रमामुळे या घातक आजाराचे प्रमाण कमी झाले आहे.
एका विशिष्ट जंतूच्या संसर्गामुळे घसा, नाक वगैरे ठिकाणी होणाऱ्या सांसर्गिक रोगाला घटसर्प असे म्हणतात. या रोगामध्ये ग्रस्त भागावर पांढरट पिवळट रंगाचा चामड्यासारखा पापुद्रा वा साखा जमतो. येथील ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांचा) कोथ (रक्त पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मृत्यू होणे) होऊन त्यावर रक्तातील फायब्रीन (रक्त गोठण्याचे वेळी फ्रायब्रिनोजेन या रक्तातील प्रथिनापासून तयार होणारे प्रथिन) जमा होऊन त्याच्यापासूनच हा पापुद्रा तयार होतो. हा रोग २ ते १८ वर्षांच्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. प्रौढांत त्याचे प्रमाण कमी असते.
घटसर्पाच्या जंतूला कॉरिनिबॅक्टेरिटम डिप्थेरी असे नाव असून त्याचा शोध १८८३ मध्ये क्लेप यांनी लावला; त्याचे सविस्तार वर्णन लफ्लर यांनी केले म्हणून त्या जंतूला ‘क्लेप्स-लफ्लर’ जंतू असेही म्हणतात. हा जंतू दंडाकृती असून त्याची अनेक रूपे दिसतात. दंडाला कांही ठिकाणी बाक आल्यासारखा, तर काही ठिकाणी त्यात रंजक-कण साठल्यासारखे दिसतात. सूक्ष्मदर्शकाने तपासले असता त्यांची मांडणी चिनी अक्षरांसारखी दिसते. हा जंतू अचल व अबीजाणू (सुप्तावस्थेतील निरोधीरूप प्राप्त न होणारा) असून त्याचे शरीराबाहेर संवर्धन केले असता, तो द्राक्षशर्करेचे (ग्लुकोजाचे) किण्वन (आंबण्याची क्रिया) करू शकतो. परंतु उसाच्या साखरेचे किण्वन करू शकत नाही. ग्रॅम यांच्या रंजकपद्धतीने रंजक क्रिया केल्यास तो जंतू ‘ग्रॅम रंजकव्यक्त’ (ग्रॅम रंजकाने रंगणारा) दिसतो. या जंतूच्या संसर्गक्षमनेनुसार त्याचे तीव्र, मध्यम आणि सौम्य असे तीन प्रकार मानलेले आहेत.
घटसर्पाच्या जंतूंसारखेच दिसणारे आणि तसेच रंजकगुण असलेले आणखी एका प्रकाराचे जंतू कित्येक वेळा घशात व जखमांत आढळतात. परंतु ते संसर्गी नसतात. त्यांना घटसर्पाभ जंतू असे म्हणतात. या जंतूचे व्यवच्छेदक (दोन सारखी लक्षणे दाखविणार्यात रोगांतील सूक्ष्म फरक ओळखून) निदान करण्यासाठी त्यांची विविध शर्करांवरील किण्वन क्रिया तपासावी लागते. या जंतूंपासून रोग होत नसल्यामुळे असे व्यवच्छेदक निदान करण्याची फार जरूरी असते.
घटसर्पाचे जंतू ग्रस्त (रोगपीडित) भागांतच असतात; परंतु त्यांच्यापासून उत्पन्न होणारे बाह्यविष रक्तमार्गे सर्व शरीरभर पसरून लक्षणे आणि उपद्रव उत्पन्न करते. ह्या बाह्याविषाचा हृद्स्नायूंवर फार विपरीत परिणाम होत असल्यामुळे या रोगाची मारकशक्ती फार असते. तंत्रिकांवरही (मज्जांवरही) या विषाचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे स्नायुपक्षाघात होण्याचा संभव असतो. हे बाह्यविष शुद्ध स्वरूपात तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग घटसर्पाची सक्रिय प्रतिरक्षा (रोगापासून संरक्षण) उत्पन्न करण्यासाठी केला जातो.
रोग्याच्या खोकण्या-शिंकण्याबरोबर तुषार रूपाने हे जंतू बाहेर पहून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग करतात. तसेच दूषित हातरुमाल, कपडे, भांडी, टॉवेल वगैरे जिनसांमुळेही संसर्ग होऊ शकतो. रोग होऊन गेल्यानंतरही कित्येक दिवस हे जंतू रोग्याच्या नाकात व घशात असू शकतात. तसेच काही व्यक्तींना रोग झाला नसला, तरी त्यांच्या नाक-घशात हे जंतू असू शकतात. अशा व्यक्तींना ‘रोगावहक’ असे नाव असून त्यांच्यामुळेही रोग संसर्ग होऊ शकतो.
रोग लक्षणे
- नाकातून वाहाणे
- घशात वेदना
- ताप
- कसेतरी वाटणे
- घसा खवखवणे
- सौम्य ताप
- घशामध्ये राखडी रंगाचा पडदयाचा पट्टा किंवा पट्टे
- संसर्ग झाल्यानंतर ३ ते ५ दिवसांच्या परिपाककालानंतर (रोगजतूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोग लक्षणे दिसेपर्यंतच्या काळानंतर) लक्षणे सुरू होतात. घसा खवखवणे, दुखणे, नाक वाहणे या प्राथमिक लक्षणांनंतर अंगावर काटा येऊन ज्वर चढतो. कित्येक वेळा ज्वर फार नसला तरी रोग तीव्र व मारक असू शकतो. अतितीव्र घटसर्पात ज्वर मुळीच नसतो, उलट शक्तिपात होऊन रोगी पांढरा फटफटीत पडतो. त्याची चर्या भीतिग्रस्त असल्यासारखी असून ओठ निळसर दिसतात. रोगी अत्यंत अस्वस्थ असतो.
- ग्रस्त भागावर म्हणजे मुख्यतः घशातील गिलायूवर (टॉन्सिल्सवर) अथवा ग्रसनीच्या (घशाच्या) पश्चभित्तीवर वर वर्णन केलेला पापुद्रा वा साखा दिसू लागतो. हा पापुद्रा प्रथम पांढरट असून पुढे तो पिवळट लालसर होतो. पापुद्रा खरडून काढण्याचा प्रयत्न केल्यास तो नाकाच्या आतील श्लेष्मकला (बुळबुळीत पदार्थ स्रवणारे पातळ पटल) स्वरयंत्र आणि श्वासनालामध्येही (मुख्य श्वसनलिकेमध्येही) संसर्ग झाल्यास असाच पापुद्रा तयार होतो. त्वचेवरील जखमा, नेत्रश्लेष्मकला, योनी आणि मणिच्छद (शिश्नातच्या सर्वांत पुढील भागावरील त्वचेचे आवरण) या जागीही क्वचितप्रसंगी घटसर्पाचा संसर्ग झाल्यास असाच पापुद्रा दिसू लागतो.
- घशात सूज आल्यामुळे मानेतील गाठी व त्याभोवतीच्या ऊतकांना शोथ (दाहयुक्त सूज) आल्यामुळे सर्वच मान सुजून जाड दिसते. घशाच्या व स्वरयंत्राच्या शोथामुळे गिळणे, श्वास घेणे या क्रियांना फार अडथळा होतो, त्यामुळे दर श्वासागणिक घशातून चमत्कारिक आवाज येतो. श्वसनक्रिया नीट न चालल्यामुळे रक्ताला पुरेसा ऑक्सिजनपुरवठा मिळत नाही. त्यामुळे सर्वांगाला विशेषतः चेहऱ्याला निळसर छटा येते.
- श्वासाला एक तऱ्हेची दुर्गंधी येऊन नाकातून रक्तमिश्रित स्राव होऊ लागतो.
- श्वसनरोध आणि जंतूंचा हृद्स्नायूंवरील विपरीत परिणाम यांमुळे मृत्यू ओढवतो. तंत्रिकांवरील परिणामामुळे मृदुतालू, डोळ्याचे स्नायू, ग्रसनी, हातपाय व क्वचित शरीराचा अर्धा भाग या अनुक्रमाने पक्षाघात होऊ शकतो. असा पक्षाघात रोगाच्या ५-६ व्या दिवसापासून ४०-४५ व्या दिवसांपर्यंत होऊ शकतो. कित्येक वेळा मूळ दुखणे सौम्य असल्यामुळे पक्षाघात झाल्यानंतरच निदान होऊ शकते.
- अतितीव्र प्रकारांत त्वचेखाली आणि अंतस्त्यांत (छाती व पोटाच्या पोकळीतील इंद्रियांत) रक्तस्राव होतो.
निदान :
वर वर्णन केलेल्या लक्षणांवरून विशेषतः ग्रस्त भागावरील पापुद्यावरून निदान करणे फारसे कठीण नसते. त्या पापुद्यावर साठलेल्या स्रावामध्ये चिनी अक्षरांसारख्या दिसणाऱ्या जंतूंमुळे सूक्ष्मदर्शकाने निदान सुलभ होते. घटसर्पाभ जंतूंपासूनच निदान करणे कित्येक वेळा कठीण होते.
गिलायुशोथाच्या एका प्रकारात गिलायूवर बारीक बारीक पिवळट कण जमून ते एकत्र जमले, तर घटसर्पाच्या पापुद्यासारखे दिसतात. त्यामुळे त्याचे व्यवच्छेदक निदान काही वेळा कठीण होते परंतु सुक्ष्मदर्शकपरीक्षेने निदानास मदत होते.
चिकित्सा :
स्पष्ट निदानाची वाट न पाहता बाह्यविषप्रतिरोधी प्रतिविष (प्रतिरक्षक रक्तरस) शक्य तितक्या त्वरेने टोचणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जितक्या लवकर ही लस टोचली जाईल तितका रोगप्रतिहार होण्याचा संभव वाढतो. रोगाच्या तीव्रतेनुसार या प्रतिविषाची मात्रा द्यावी लागते. दिवसातून दोन तीन वेळाही प्रतिविष टोचणे जरूर पडते. इतर जंतूंचा संसर्ग न व्हावा म्हणून पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे वापरतात.
रोग संसर्गी असल्यामुळे शक्यतर घटसर्पाच्या रोग्याला रुग्णालयात ठेवणे इष्ट असते.
श्वसनाला अडथळा उत्पन्न झाल्यास श्वासनालाला भोक पाडून त्यात नळी घालून श्वसन व्यवस्थित चालण्याची तरतूद करावी लागते. या शस्त्रक्रियेने एक मोठा धोका टळतो.
संपूर्ण विश्रांतीची अत्यंत जरूरी असते. हालचाल केली असता हृद्स्नायूंवर ताण पडून हृदय बंद पडण्याचा संभव असतो. रोग्याला पूर्णपणे निजवून ठेवून जरूर तर नाकातून नळी घालून अन्न द्यावे लागते.
रोगप्रसार
घटसर्पाचा जीवाणू जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीच्या तोंड, नाक व घसा या भागात वास्तव्य करतो. खोकला व शिंकेच्या माध्यमातून तो एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीपर्यंत पसरतो.
रोगप्रतिबंधक उपाययोजना
बालपणाच्या सुरुवातीच्या काळात डीपीटी (घटसर्प, डांग्या, खोकला व धर्नुवात यांचे एकञीत ट्रीपल) लसीकरण ही प्रतिबंधाची सर्वांत प्रभावी पध्दत आहे. लसीकरणाच्या अभावी १४ वर्षापर्यंतची बालके घटसर्प रोगाच्या जंतुसंसर्गाला वारंवार संवेदनशील आहेत. लसीकरण कार्यक्रमाच्या वेळापञकानुसार डीपीटीचे लसीकरण देण्यात यावे.
प्रतिबंध
मुलांना घटसर्पा च्या विरोधात डीपीटीची लस.