वरवर रुक्ष दिसणारी कोरफड ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्म असलेली आहे. विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वनस्पती वरदान ठरते. अनेक संशोधनातून हे समोर देखील आले आहे.
कोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. यामुळे शरीरातील इंश्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. वरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते. योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.
अनेकदा मधुमेहामुळे डोळे, किडनी आणि हृदयाला नुकसान पोहचल्यावरच हा आजार असल्याचे निष्पन्न होते. सुरुवातीला याचा पत्ताही आपल्याला लागत नाही. शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करणाऱ्या या आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यावर उपचार करता येतात. शरीरात होणारे हे बदल मधुमेहाचा संकेत देतात. पाहुया काय आहेत याची लक्षणे...
वारंवार लघवी येणे
जेव्हा शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवी येते. शरीरात जमा झालेली शुगर मुत्राद्वारे शरीराबाहेर टाकली जाते.
खूप तहान लागते
ब्लड शुगरने पीडित व्यक्तीला सारखी तहान लागते.
भूक वाढते
शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्याने सारखी भूक लागते. तुम्हालाही हे लक्षण दिसताच एकदा ब्लड शुगर तपासून पहा.
वजन कमी होणे
भूक वाढूनही वजन मात्र कमी होत असल्यास ब्लड शुगर जरुर तपासा.
थकवा येणे
दिवसभर आळसावलेले वाटणे, थोडेसे काम केल्याने थकवा जाणवणे किंवा रात्रभर झोपूनही झोप पूर्ण झाल्यासारखी न वाटणे. ही लक्षणे मधुमेहाचा इशारा देतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करु नका.
कोणत्याही कामात मन न लागणे किंवा एकाग्रता कमी होणे
ब्लड शुगर अधिक असलेल्या व्यक्तीचे मन कोणत्याही कामात लागत नाही. कोणत्याही कामात एकाग्र करणे त्यांना अवघड होते.
अंधूक दिसणे
मधुमेहाचा सर्वात अधिक प्रभाव डोळ्यांवर पडतो. त्यामुळे व्यक्तीला कमी दिसू लागते. ब्लड शुगरमुळे डोळ्यांच्या पडद्यांना नुकसान पोहचते.
जखम उशिरा ठीक होणे
भाजी कापताना बोट कापल्यास किंवा शेव्हींग करताना कट गेल्यास ते लवकर ठीक होत नाही? मग हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण आहे.
त्वचेची समस्या
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्वचेच्या समस्या तोंड वर काढू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स खूप जलद गतीने वाढू लागतात.
वरवर रुक्ष दिसणारी कोरफड ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्म असलेली आहे. विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वनस्पती वरदान ठरते. अनेक संशोधनातून हे समोर देखील आले आहे.
कोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. यामुळे शरीरातील इंश्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. वरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते. योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.
मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.
1. मश्रुममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.
2. मश्रुममध्ये उपस्थित तत्त्व रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मश्रुममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला उत्तम बनवतो.
3. मश्रुम विटामिन डी चा चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मश्रुमाचे सेवन नियमित केले तर आमच्या आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी आम्हाला मिळून जात.
4. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.
5. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.
त्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही स्टडीत असे आढळून आले आहे की मश्रुमच्या सेवनामुळे कँसर होण्याची आशंका कमी असते.
मुंबई : जर तुम्हाला देखील मधुमेहाचा त्रास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आता कोणतेही औषध न खाता तुम्ही तुमच्या शरीरातील साखर कमी करू शकता. अगदी घर बसल्या हा उपया तुम्ही करू शकता. भेंडी खाऊन तुम्ही तुमच्या शरीरातील साखर कमी करू शकता. याचा कोणताही साइड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही.
बघूया कसं कराल मधुमेह कंट्रोल
कच्ची भेंडी खाल्यामुळे मधुमेह आटोक्यात येतो. यामध्ये असलेल्या फायबर डायबिटिक असलेल्या लोकांना साखर कमी करण्यास अतिशय मदत करते.
कच्ची भेंडी अशा प्रकारे शरीरात करते काम
दोन भेंडी घेऊन ते वरून आणि खालून दोन्ही बाजूने कापा. यामधून एक सफेद चिकट द्रव बाहेर पडेल तो तसाच राहू द्या. जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाल तेव्हा या कापलेल्या भेंडी तुम्ही ग्लासभर पाण्यात टाकून ठेवा. आणि हे ग्लास झाकून ठेवा.
सकाळी उठल्यावर ही कापलेली भेंडी काढून टाका आणि ते पाणी प्या. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील साखर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही हा असा प्रकार अनेक महिने करा. कच्चा भेंडीप्रमाणेच शिजवलेली भेंडी देखील अतिशय फायदेशीर आहे.
किडनी रोगापासून देखील होईल सुटका
टाइप 2 डायबिटीज झाल्यामुळे किडनीवर देखील त्याचा फरक पडतो. त्यावेळी जर तुम्ही भेंडी खाल्ली तर त्याचा नक्की फरक पडेल.